भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

नदीची आत्मकथा/मनोगत/आत्मवृत्त मराठी निबंध | Nadi ki atmakatha in marathi

Nadi chi atmakatha in marathi : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक स्त्रोतापैकी एक आहे नदी आणि नदीचे पाणी. नदी ही मनुष्याच्या अस्तित्वासाठी उपयुक्त आहे. असे म्हटले जाते की जल हेच जीवन आहे. 

म्हणूनच आजच्या या लेखात आपण  नदीचे आत्मवृत्त/आत्मकथा/ मनोगत  मराठी निबंध किंवा  नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी पाहणार आहोत. तर चला सुरू करूया...

nadiche atmavrutta essay in marathi

1) नदीची आत्मकथा | Nadi ki atmakatha in marathi 

मी एक नदी आहे. नदी हा शब्द तुम्हाला तर परिचितच असेल. पण तरीही मी आज तुम्हाला माझा परिचय देणार आहे मी कोण आहे? कुठून आले आहे? माझे अस्तित्व काय आहे? भारतासह मला जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे सरिता, जीवनदायिनी, रिव्हर इत्यादी. स्वभावतः मी खूप चंचल आहे परंतु कधीकधी शांत देखील होऊन जाते. खळखळ करत मी वाहत राहते. सतत- न थांबता, न अडकता मी वाहते. माझा जन्म पर्वतांमध्ये झाला होता, तेथून झऱ्यांच्या मदतीने मी जंगल आणि गावांमधून वाहत वाहत पुढे समुद्राला जाऊन मिळते.

माझ्या प्रवाह कधी कमी तर कधी जास्त होतो. माझा आकार स्थानानुसार कधी लहान तर कधी मोठा होत असतो. माझ्या मार्गात खूप अडचणी येतात, कधी दगड गोटे तर कधी मोठ मोठे पर्वत पण मी कधीही थांबत नाही. माझा मार्ग मी स्वतः तयार करून वाहत राहते. मनुष्य अनेक प्रकारांनी माझ्याशी जुळलेला आहे. तुम्ही असेही म्हणू शकतात की मी मनुष्यासाठी खूप उपयुक्त आहे. मनुष्याला अनेक पद्धतीने जीवन जगण्यासाठी मी मदत करते. माझ्या पाण्यात अनेक जलचर जीवजंतू राहतात मनुष्य त्यांना पकडून खातो. अश्या पद्धतीने मी मनुष्याची अन्नाची भूक भागवते. माझ्यामुळे भूतलावावरील सर्व घरांमध्ये पाण्याची व्यवस्था होते. मनुष्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पाणी हे अतिशय उपयुक्त आहे.

मी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत करते. माझ्या पाण्याच्या मदतीने मनुष्य वीज तयार करतो आणि याच विजेच्या मदतीने अनेक उपकरणे कार्य करतात. शेतकरी माझे पाणी शेतात पिकांसाठी वापरतो, ज्यामुळे शेतातील पिके लहरायला लागतात. जंगलातून वाहताना मी जंगली पशु पक्ष्यांची तहान भागवते व यासोबतच जंगलातील झाडांना पाणी पुरवठा करते. 

माझ्या बद्दल सांगायचे झाले तर मलाही भावना आहेत, मला देखील आनंद व दुःख होते आणि मनुष्य मला अतिशय लोभी जाणवतो. आपले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तो काहीही करू शकतो. मनुष्या द्वारे मला देवीच्या रूपात पूजले जाते, लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला प्रार्थना करतात, उपवास ठेवतात, फुले चढवतात. आणि मग दुसरी कडे तेच माझ्या पाण्यात कचरा व घाण टाकतात, मला प्रदूषित करतात. आता तुम्हीच सांगा की कोणी देवीला प्रदूषित करत का? माझी इच्छा फक्त एवढीच आहे की जर मनुष्य मला देवी मानत असेल तर त्याने मला प्रदूषित करायला नको. 

आजच्या परिस्थितीत नदीचे पाणी अतिशय प्रदूषित झाले आहे. मोठमोठ्या कारखान्यातून निघणारा विषारी पदार्थांचा कचरा, घरातून निघणारा केर, प्लास्टिक, मृत लोकांची राख, विविध सण व कार्यक्रमांचा कचरा इत्यादी अनेक वस्तू माझ्या पाण्यात मिसळून मला प्रदूषित करीत आहे. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की मला प्रदूषित करणे म्हणजे मनुष्याचाच नाश करणे होय. कारण जर मी अति प्रमाणात प्रदूषित झाले तर मनुष्याला प्यायला स्वच्छ पाणी मिळणार नाही व अशुद्ध पाणी पिल्याने अनेक रोग वाढायला लागतील. म्हणून सर्वांनी आजच आपले कर्तव्य लक्षात घेऊन नदी व संपूर्ण पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या निर्णय घ्यायला हवा.

2) नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी | N adi che atmavrutta 

मी एक नदी आहे. मला अनेक नावांनी ओळखले जाते जसे नदी, नहर, सरिता, प्रवाहिनी, जीवनदायिनी इत्यादी. ही सर्व नावे माझा स्वभाव आणि गती च्या आधारावर ठेवली आहेत. सर सर आवाज करीत वाहिल्याने मला सरिता म्हटले जाते. नेहमी प्रवाहात वाहिल्याने मला प्रवाहिणी म्हणतात. मी पाण्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेते. पाण्याला जीवन म्हटले जाते आणि मी पाण्याचा स्त्रोत असल्याने मला जीवनदायिनी म्हणतात. 

साधारण भाषेत तुम्ही मला नदी म्हणू शकतात. माझे दररोजचे काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत, पृथ्वीवरील पशुपक्षी, मनुष्य व झाडाझुडपांची तहान भागवणे आहे. मी जेथे जाते तेथे मनुष्य, पशु पक्षी आणि झाडांची तहान भागवून त्यांना तृप्त करते. माझ्या पाण्यामुळे झाले हिरवी व टवटवीत बनतात. मी हे कार्य नित्य करीत असते व यातच माझ्या जीवनाची सार्थकता आहे. 

आज मैदानी भागात मी ज्या रूपात दिसते, त्या रूपात मी नेहमी पासून नव्हते. माझी सुरुवात हिमालय मधील बर्फाच्या पर्वतात दगडांच्या खाली झाला होता. मी एका शिलालेखातून उत्पन्न होऊन मधुर संगीत करीत पुढे सरकू लागले. जेव्हा मी प्रवाहाने वाहत होते तेव्हा माझ्या मार्गात अनेक अडथळे यायला लागले. या मध्ये लहान मोठे दगडगोटे, झाडे झुडपे आणि मोठ मोठ्या पर्वतांचा समावेश होता. या सर्वांनी एक एक करून माझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझे संपूर्ण बळ लाऊन त्यांच्यातून मार्ग काढला. 

अशा पद्धतीने मोठमोठी पर्वते आणि जंगल पार करीत मी शेवटी मैदानी प्रदेशात येऊन पोहचले. मी जेथून जेथून वाहू लागले त्या त्या ठिकाणी माझ्या दोन्ही बाजूंना तट बनवण्यात आले.  दिवसेंदिवस माझा विस्तार होत होता. हळू हळू माझ्या तटावर वस्तू बसू लागली. अनेक लोक आपापली घरे आणि झोपड्या माझ्या किनाऱ्यावर बनवू लागले. आज मी ज्या ज्या ठिकाणांहून वाहते तेथे अनेक लहान मोठी गावे आहेत. हे सर्व लोक माझ्या पाण्यावर अवलंबून असतात. शेती आणि पिण्यासाठी ते माझे पाणी वापरतात. लोकांनी आपल्या सुविधेसाठी माझ्या वरून अनेक लहान मोठे पुल बनवले आहेत. या पुलावरून गाड्या मोटारी वाहतूक करीत असतात. 

बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी मुळे माझे पाणी वाढते. मला महापूर येतो अश्या वेळी पुल तसेच अनेक लहान मोठ्या गावांमध्ये पाणी शिरते. या पाण्यामुळे लोकांनी त्रास होतो. परंतु मी देखील काय करू शकते माझा प्रवाह माझ्या ताब्यात थोडीच असतो. मी माझ्या जीवन काळात अनेक गावं आणि शहरांमधून वाहिले आहे. अनेक सैनिक, राजे महाराजे, डाकू आणि साधू संतांना मी पाहिले आहे. जुनी घरे नष्ट होताना आणि नवीन वस्ती स्थापित होतांना मी पाहिली आहे. 

मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. अनेक संकटे व दुःखाचा मी सामना केला आहे. तुम्हा सर्वांना माझा सल्ला आहे की तुम्ही देखील संकटाना घाबरता व धीर न सोडता सामोरे जा आणि आपल्या आयुष्यात हवे ते प्राप्त करा.

या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणे देखील असू शकते...

  • नदीची आत्मकथा मराठी निबंध
  • नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी
  • नदीचे मनोगत
  • मी नदी बोलतेय..
  • nadiche atmavrutta
  • nadiche  manogat
  • nadichi  atmakatha
  • autobiography of river in marathi 

तर मित्रांनो हे होते nadi chi  atmakatha marathi nibandh तुम्हाला हे निबंध कसे वाटले तुम्ही आम्हाला कमेन्ट मध्ये सांगू शकतात, या शिवाय इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध आणि मराठी भाषण मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट भाषणमराठी.कॉम 

विडियो पहा:

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी Nadichi Atmakatha in Marathi

Nadichi Atmakatha in Marathi – Mi Nadi Boltey Marathi Nibandh नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये नदीची आत्मकथा या विषयावर निबंध लिहिणार आहोत आणि यामध्ये नदीची आत्मकथा म्हणजे नदीच आपल्या प्रवाहाबद्दल, तिच्या उगम कोठे झाला आणि ती कशी वाहते याबद्दल सांगितल्यासारखी शब्द रचना म्हणजे नदीची आत्मकथा सांगणे. या आत्मकथेमध्ये नदी कशी वाहते, कोठून वाहते, तिचे वर्णन या सर्व गोष्टींचा समावेश असतो. चला तर मग आता आपण नदीची आत्मकथा या विषयावर निबंध लिहुयात.

आपण नदीची आत्मकथा हा निबंध पाहण्याअगोदर नदी म्हणजे काय हे जाणून घेवूया. नदी हे पाण्याचे एक नैसर्गिक स्त्रोत्र आहे आणि नदी हि अनेक ओढे, नाले एकत्र येवून बनलेली असते आणि नदीचा उगम हा जंगलातून, डोंगराळ भागावरून आणि खोल दऱ्यातून होतो. जर एकादि मोठी नदी असेल तर त्या नदीला अनेक छोट्या मोठ्या उपनद्या येवून मिळालेल्या असतात. नद्या ह्या आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे म्हणजेच ह्या मानवी संस्कृतीची जीवनवाहिनी आहे तसेच नदीचे पाणी हे ग्रामीण भागामध्ये, शेतांच्यासाठी, शहरामध्ये पुरवले जाते.

nadichi atmakatha in marathi

नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी – Nadichi Atmakatha in Marathi

Nadiche atmavrutta in marathi.

नदी हा शब्द जरी तुम्हाला ओळखीचा वाटत असला तरी आज मी तुम्हाला नदी हिची आत्मकथा सांगणारा आहे. नदी म्हणते मी खूप शांत प्रवाहाने वाहते म्हणजेच माझा स्वभाव हा खूप चंचल आहे आणि मी कुठेही न थांबता कित्येक दिवस वाहत असते आणि मी जाऊन शेवटी समुद्राला मिळते. मी एक नदी आहे आणि माझा जन्म हा डोंगर आणि दऱ्यांच्या मधूल झाला आहे आणि माझा जन्म हा खूप पूर्वीचा आहे. मी डोंगर दरी मधून वाहत असताना माझी पाण्याची पातळी तशी कमीच असते आणि ज्यावेळी वाहत वाहत मैदानाकडे जाते त्यावेळी माझ्या पाण्याची पातळी वाहत जाते.

ज्यावेळी मी पहिल्यांदा दरी किंवा डोंगरातून उगम पावले त्यावेळी मी अनेक अडथळे पार करत आले आणि मग माझा प्रवाह देखील शांत झाला आणि मला आता शांतपणे वाहणारी म्हणून ओळखले जाते. नदी म्हणते भारतभूमीवर मी अनेक ठिकाणी वाहते आणि मला भारतभूमीवर अनेक नावे देखील देण्यात आली आहेत जसे कि कृष्णा , गंगा , यमुना , गोदावरी , नर्मदा , सरस्वती, कावेरी . माझा प्रवाह हा न थांबता वाहत असतो आणि हा कधी कधी वेगाने वाहतो किंवा मग कधी कधी शांतपणे वाहतो आणि बहुतेकदा माझा प्रवाह वेगाने वाहण्याचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणाहून पाणी म्हणजेच ओढे, नाले आणि इतर भागातून पाणी मला येवून मिळते आणि त्यामुळे माझ्या पात्रामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठते त्यामुळे माझ्या प्रवाहाला वेग येतो.

तसेच त्या जास्त पाण्यामुळे मी पात्राच्या बाहेर देखील जाते. तसेच ज्यावेळी माझ्या पात्रामध्ये जेमतेम पाणी असते किंवा ज्यावेळी पावसाचा सीजन नसतो त्यावेळी मी खूप शांतपणे वाहते. माझ्या पत्राचा आकार हा काही ठिकाणी मोठा असतो तर काही ठिकाणी हा खूप लागण असतो म्हणजेच हे तेथील स्थानावर अवलंबून असते. माझ्या प्रवाहामध्ये अनेक मोठ मोठे डोंगर, मोठ मोठे दगड येतात त्यामुळे मला देखील वाहताना खूप अडथळ्यांना सामोरे जावे लागते तरी देखील मी अडथळ्यांवर मात करत करत पुढे वाहते.

Mi Nadi Boltey Marathi Nibandh

माझा प्रवाह हा सतत सरळ किंवा मग नागमोड्या वळणावर वाहत असतो आणि माझ्या पात्राच्या बाजूने अनेक झाडे असतात आणि त्यांना सतत पाणी मिळत असल्यामुळे ती चांगली वाढतात आणि माझ्या अवतीभवतीचा परिसर हा खूप हिरवळ असतो आणि ते दृश्य पाहण्यासाठी खूप छान वाटते तसेच ज्या लोकांना निसर्गाची ओढ असते ते लोक माझ्या काठावर बसून खूप वेळ घालवतात. मला जगामध्ये नैसर्गिक संसाधन म्हणून ओळखले जाते कारण माणसांच्या अनेक गरजा मी भागवतो.

मी जंगल, डोंगर आणि इतर अडचणीच्या भागातून वाहत असते आणि वाहत असताना अनेक प्राणी आणि पक्षी आपली तहान भागवण्यासाठी माझ्या पात्रातील पाणी पितात आणि आपली तहान भागवतात त्यामुळे मी जंगलातील प्राण्यांच्यासाठी आणि पक्ष्यांच्यासाठी देखील खूप मदतगार आहे. तसेच माझे पाणी लोक अनेक कारणासाठी वापरतात, माझे पाणी माझ्या जवळच्या गावामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी करतात तसेच लोक माझ्या पात्रामध्ये कपडे धुण्यासाठी, जनावरे धुण्यासाठी येतात तसेच माझे पाणी हे शुद्ध करून पिण्यासाठी देखील वापरले जाते कारण मी एक गोड्या पाण्याचे स्तोत्र आहे.

शेतीतील पिकांच्यासाठी गोड्या पाण्याची गरज असते आणि माझे पाणी गोडे असल्यामुळे माझ्या गावाजवळ असणारी सर्व गावे त्यांच्या त्यांच्या शेतीसाठी देखील माझेचा पाणी वापरतात. अश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी माझ्या पाण्याचा वापर करतात. मी वाहत असताना माझ्यापासून अनेक छोटे छोटे कालवे तयार होतात आणि त्या कालाव्यांचा वापर शेतीच्या सिंचनासाठी केला जातो.

त्याचबरोबर पाण्याचा उपयोग हा वीज निर्मिती करण्यासाठी देखील केला जातो आणि माझ्या पात्रातील पाण्याचा उपयोग देखील वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो. भारतामध्ये नदीला आणि एक धार्मिक महत्व आहे तसेच भारतातील गंगा नदी हि एक पवित्र नदी मानली जाते तसेच असे म्हटले जाते कि आपण गंगा नदीमध्ये अंघोळ केली तर आपले सर्व पाप नष्ट होतात. तसेच नदीचे पाणी काही ठिकाणी धार्मिक पूजेसाठी वापरले जाते तसेच माझे पाणी काही उत्सवांच्यासाठी देखील देखील वापरले जाते.

पण सध्या मानवाने माझे कसेही वापरून माझ्या पात्रातील पाण्याचे प्रदूषण केले आहे त्यामध्ये कचरा टाकला आहे, प्लॅस्टिक वस्तू टाकून पाणी पूर्णपणे प्रदूषित केले आहेत तसेच सध्या औद्योगीकरण देखील खूप वाढले आहे आणि औद्योगीकरणातील पाणी देखील मळीचे किंवा घाण पाणी देखील नदी मध्ये सोडले जाते त्यामुळे माझे पाणी दुषित होते.

जसे माणसाला माझ्या पाण्यापासून अनेक फायदे होतात तसेच माझ्या पाण्यापासून अनेक तोटे देखील होतात. ज्यावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो तेंव्हा ओढ्याचे पाणी, नाले, शेतातील बाहेर पडणारे पाणी, गावातून बाहेर पडणारे पाणी हे सर्व एकत्र येवून नदीला मिळते आणि त्यामुळे नदी पूर्णपाने भरून ते पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर पडून जवळ असणाऱ्या गावामध्ये शिरते आणि अनेक लोकांच्या घरामध्ये शिरते आणि त्यामुळे लोकांचे अनेक नुकसान होते. अश्या प्रकारे कोणत्याही नदीची आत्मकथा सारखीच असते.

आम्ही दिलेल्या nadichi atmakatha in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nadi ki atmakatha essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि marathi essay on river माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nadichi atmakatha in marathi nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध Nadiche Aatmavrutta Marathi Essay

Nadiche Aatmavrutta Marathi Essay: लोक म्हणतात की जसेजसे वय वाढते तसतसे एखादी व्यक्ती मोठी होते, परंतु माझा यावर विश्वास नाही. हजारो वर्षे निघून गेली आहेत, परंतु काळाचा माझ्या आयुष्यावर कधी परिणाम झालाच नाही. आजही मी वेगवेगळ्या प्रदेशात निर्भयपणे चालत आणि चालतच आहे.

माझा जन्म इथून खूप दूर डोंगरावर झाला. माझं बालपण मी त्या डोंगराच्या हिरव्यागार खोऱ्यात घालवलं आहे. किती सुंदर सकाळी होती! दिवसभर ‘खळ खळ’ हे संगीत गुणगुणत, झाडांशी लपंडाव खेळत  मी नेहमीच माझ्या मार्गाने विविध प्रदेशांमध्ये पुढे जात राहिले.

एके दिवशी मला दऱ्यांमधून उड्डाण करण्याची इच्छा झाली. दगडांनी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी कसली थांबायचे?  मोठ्या त्रासात खडक फोडून मी शेवटी मोकळ्या जागेवर पोहोचले. हे ठिकाण माझ्या जन्मस्थळापासून खूपच खाली होते. थकव्यामुळे माझा वेग मंदावला. इथे माझ्या दोन्ही बाजूंनी हिरवे गवत पसरले होते. एक दिवस मी बरेच माणसे माझ्या दिशेने येताना पाहिले. माझ्या बाजूला असलेल्या झोपड्यांमध्ये ते राहू लागले. त्यांनी माझ्यामध्ये आंघोळ करू लागले, त्यांचे कपडे माझ्या पाण्याने धुवू लागले आणि माझे पाणी पिऊन आनंदी झाले. हळू हळू बरीच गावे माझ्या बाजूने वसली. अशा प्रकारे मी ‘लोकमाता’ झाली.

सभ्यतेची जननी

हळूहळू माझ्या किनाऱ्यालगत बरीच शहरे बांधली गेली. मला वाटलं नव्हतं की जो असंस्कृत माणूस एक दिवस माझ्या आश्रयाला आला होता तो संस्कृती आणि सभ्यतेच्या क्षेत्रात एवढी प्रगती करेल. आज मानवनिर्मित मोठी जहाजेही माझ्यावर फिरतात. माझ्यावर पूल बांधले जात आहेत, धरणे बांधली जात आहेत. माझ्या पाण्यापासून निर्माण होणाऱ्या वीजेद्वारे कारखाने चालत आहेत. मला माहित नाही की माझ्या किनाऱ्यावर किती जत्रा आणि उत्सव साजरे केले जातात. लोक माझ्या किनाऱ्यावर येतात आणि त्यांचे दुःख विसरतात. मुले खेळतात, कवी कविता करतात आणि चित्रकार माझे सौंदर्य रेखाटतात.

पण जिथे मी सभ्यतेची जननी आहे, तिथे इच्छा नसतानाही मी बर्‍याचदा जीवन विस्कळीत करते. एकदा जोरदार पावसामुळे माझे पाणी कडा फोडून गावागावात पोहोचले होते. किनारपट्टीवरील बरीच गावे पाण्यात बुडाली होती. मृत्यूने असंख्य प्राणी गिळंकृत केले होते. हे सर्व पाहून माझे हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते.

लोककल्याणकारी काम करत आणि सभ्यतेचा इतिहास लिहित मी पुढे जात राहिले. मग मी विशाल समुद्राचे मोहक रूप पाहिले आणि माझ्यामध्ये प्रेमाची तहान निर्माण झाली. मी त्याला शरण गेले. आणि तेव्हा मला आयुष्याचा पूर्णपणा आणि समाधान जाणवले.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध
  • Autobiography of a river Essay | Nadi ki atmakatha Nibandh | नदीची आत्मकथा मराठी निबंध
  • Autobiography of a Soldier Essay | Sainikachi atmakatha Nibandh | एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • Autobiography of flowers Essay | Fulache Atmavrutta Nibandh | फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • Autobiography of road Essay | Mi Rasta Boltoy Nibandh | मी रस्ता बोलतोय मराठी निबंध
  • Autobiography of a Clock Essay | Ghadyal chi atmakatha Nibandh | एका घड्याळाची आत्मकथा मराठी निबंध.

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

नदीची आत्मकथा मराठी निबंध | Nadichi Atmakatha Marathi Nibandh

Set 1: नदीची आत्मकथा मराठी निबंध – nadichi atmakatha marathi nibandh.

मी आहे भीमा नदी . मी महाराष्ट्रातल्या भीमाशंकर ह्या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते बरे का? तिथेच भीमाशंकराचे देऊळ आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देऊळ आहे. मी तिथे उगम पावते म्हणुनच तेथील शिवशंकराला भीमाशंकर असे नाव मिळाले. माझ्या उगमाच्या ठिकाणी मी अगदी अवखळ असते. एखादी लहान मुलगी असावी ना तशी उत्साहाने खळखळत मी भीमाशंकरावरून धावत सुटते. सह्याद्रीच्या कड्यांवरून अनेक धबधबे आणि ओढे एकत्र येतात. त्या सर्वांचे प्रवाह एकत्र येऊन मला भीमा हे माझे नाव मिळते.

नदीला लोकमाता म्हणतात. मीही लोकमाताच आहे. माझ्या काठावरची हिरवाई फुलवत फुलवत मी पुढे जात असते. मी सतत वाहाती असते त्यामुळेच मी निर्मळ असते. वाटेत मला माझ्या पुष्कळ सख्या येऊन मिळतात. त्यांनाच तुम्ही लोक माझ्या उपनद्या म्हणता. ह्या माझ्या सख्या कोण आहेत ते सांगू का? त्या आहेत घोड, सीना, कागिनी, भामा, मुळा, मुठा, नीरा आणि इंद्रायणी. ह्या सगळ्या जणींना माझ्या पोटात मी सामावून घेते आणि तिथून पुढे जाऊन मी स्वतःच कृष्णेला मिळते.

माझ्यावर आणि माझ्या उपनद्यांवर भरपूर ठिकाणी धरणे बांधून मानवाने आमचे पाणी अडवले आहे आणि त्यावर जलविद्युत प्रकल्प काढलेले आहेत. त्यामुळे माझ्या काठावरच्या गावात वीज आली आहे. उद्योगधंद्यांनाही वीज त्यामुळेच मिळाली आहे.

ह्या उद्योगधंद्यातील सांडपाण्यामुळे माझ्या पाण्याचे प्रदूषण होते. त्याशिवाय साखर कारखान्यातील मळीसुद्धा माझ्याच पाण्यात सोडली जाते. त्यामुळे माझ्या उदरातील मत्स्यजीवन धोक्यात येते आहे. माझ्या काठच्या वाळूचा अंदाधुंद उपसा झाल्यामुळे माझ्या काठावरची जमीन खचते आहे.

माझी काळजी वेळीच घ्या असे तुम्हाला ह्या तुमच्या मातेचे कळकळीचे सांगणे आहे.

Set 2: नदीची आत्मकथा मराठी निबंध – Nadichi Atmakatha Marathi Nibandh

मुलांनो, मला ओळखलेत का? अरे, मी तुमच्या गावाच्या मध्यातून वाहणारी नदी. तुमच्या गावाजवळच्याच पर्वतात माझा जन्म झाला. मी एक खूप जुनी नदी आहे. माझे बालपण या पर्वताच्या हिरव्यागार वनराईत आणि दऱ्याखोऱ्यात गेले. अनेक लहान-लहान टेकड्या आणि जंगले पार करीत मी येथपर्यंत येऊन पोहोचले. डोंगरातून वाहताना माझ्या पाण्याला अतिशय वेग असतो आणि पाण्याचा खळ-खळ असा आवाज येतो. खाली उतरून मैदानी प्रदेशात वहायला लागल्यानंतर मात्र मी शांतपणे वाहू लागले.

माझ्या किनाऱ्यावर अनेक गावे व शहरे वसलेली आहेत. मी सर्वांनाच पाणी देते. लहान-मोठा गरीब-श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. माझ्या पाण्याचा उपयोग किती विविध कारणांसाठी केला जातो! पिण्याचे पाणी , शेती, सिंचन, धरणे, विद्युत निर्मिती. पशु-पक्षी माझेच पाणी पिऊन आपली तहान भागवतात. माझ्या पात्रात वाढणारे मासे अनेकांची भूक भागवतात. माझ्या दोन्ही किनाऱ्यांजवळ असणारी शेती कशी हिरवीगार असतो बघा. तुमच्या गावाजवळच माझ्या पात्रावर एक मोठे धरण बांधले आहे. तेथे निर्माण होणारी वीज आजूबाजुच्या १५-२० गावात प्रकाश आणते. अनेक कारखाने या वीजेवर चालतात.

वाहत रहाणे हा माझा धर्म आहे. शेवटी सागराला जाऊन मिळणे हेच माझे ध्येय आहे. मी लोकांना जीवनदान देते. म्हणूनच मला जीवनदायीनी, लोकमाता असे संबोधले जाते. पण तुम्ही माणसे अतिशय कृतघ्न आहात. गावातील सर्व कारखान्यातील घाण तुम्ही माझ्या पात्रात खुशाल सोडून देता. शहरातील घाण, मैला टाकला जातो. त्यामुळे माझे पाणी घाणेरडे व प्रदूषित झाले आहे. ते पिण्यासारखे राहीले नाही. मी आता पशु-पक्षांचीही तहान भागवू शकत नाही ही अतिशय दुःखाची बाब आहे. माझे स्वच्छ, सुंदर जीवन मला परत कधी मिळेल? माझ्या इतर बहिणींचीही हीच स्थिती आहे.

पाणी शुद्ध करण्याचे आश्वासन मला दरवर्षी मिळते. पण ते कधीच पूर्ण होत नाही. बांधकाम करुन तुम्ही माझे पात्र छोटे करुन टाकले आहे. त्यामुळे अर्थातच पावसाळयात मी फुगते आणि वाटेत आलेली प्रत्येक गोष्ट गिळंकृत करत सुटते. माझे हे रौद्र रुप पाहून तुम्ही घाबरता व मलाच दोष देता. पण मला असे बनविण्यात तुमचा मोठा हात आहे हे विसरुन जाता. माझी एवढीच इच्छा आहे की सर्वांना उपयोगी पडण्याचा माझा धर्म मला पार पाडता यावा. माझे पाणी स्वच्छ व निर्मळ असावे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर करणार ना मला प्रदूषण मुक्त?

  • नको हा मेला पोरीचा जन्म निबंध मराठी
  • नंदीबैल निबंध मराठी
  • ध्वनी प्रदूषण निबंध मराठी
  • मी पाहिलेला एक देशभक्त निबंध मराठी
  • दूरदर्शनचे फायदे व तोटे
  • दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी
  • दूरचित्रवाणी निबंध मराठी
  • दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी
  • दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी
  • दूध निबंध मराठी
  • दिल्लीची कथा निबंध मराठी
  • भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
  • भारताची राजधानी कोणती आहे
  • भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
  • ताजमहाल निबंध मराठी
  • आपले शेजारी देश निबंध मराठी
  • दिनदर्शिका निबंध मराठी
  • दारूबंदी निबंध मराठी
  • गरिबी एक शाप मराठी निबंध

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

नदीचे आत्मवृत्त निबंध 2021 – Nadi ki Atmakatha In Marathi

मी एक नदी ( Nadi ki Atmakatha In Marathi ) बोलते, माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर झाला. लहानपणी मी फारच अवघड होते. कधी एका जागेवर न थांबता मागेपुढे न पाहता एकसारखे दगड-गोटे, झाडे-झुडपे यांच्या मधून रस्ता काढत फक्त धावत राहायचे. वाटेतील वेली माझी वाट अडविण्याचा प्रयत्न करत आणि माझ्याशी लपंडाव खेळत पण कुणालाही न सापडतात मी धावत राहायचे. वाळू व माती माझ्या पात्रातून नेऊन मला कोरडे ठणठणीत करीत आहेत. कसे होणार माझी व माझ्या सहवासातील जलचरांची जोपासना कोण करेल हे मनुष्याला केव्हा कळणार? आमच्यावरील हे अन्याय-अत्याचार केव्हा थांबणार आज मनुष्याला सावध करणे गरजेचे झाले आहे.

Nadi ki Atmakatha In Marathi – नदीचे आत्मवृत्त निबंध

नदीचे आत्मवृत्त निबंध 2021 - Nadi ki Atmakatha In Marathi

मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते की, चांगल्या पाण्यात लोक घाण टाकतात. मला गलिच्छ करतात मी इतके चांगले त्यांचे करत असते. माझा श्वास गुदमरला इतकी घाण फुले कचरा आणि सांडपाणी टाकून मला प्रदूषित करतात. तेच पाणी पिऊन मग त्रस्त होतात. त्यांना हे कळत नाही की मी वाहत राहिले तरच त्यांना चांगले पाणी मिळेल. त्यांना कोण सांगणार, मी हे सर्व मूकपणे सहन करते आणि माझ्या बाबांकडे आणि शंकराकडे विनवणी करते, की त्यांना समजू दे. नाहीतर माझा संयम संपला तर ह्याचा सर्वनाश होईल. देवा ही वेळ माझ्यावर आणू नको.

नक्की वाचा – पर्यावरण विषयी निबंध – Essay On Environment In Marathi Language 2021

नक्की वाचा – माझे गाव मराठी निबंध

मला अनेक भाऊ-बहिणी येऊन मिळायचे त्यामुळे माझा वेग वाढतच असते. त्यापासून पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात अनेक संकटे येतात. त्या सर्व संकटांना तोंड देत मी माझे ध्येय गाठत असते. एखाद्या योध्याप्रमाणे मी लढत असते आणि पुढे जात असते. नंतर मात्र वाट चालणे मुश्कील होईल कारण सपोर्ट रस्त्यांवर शेतीवर अनेक अडथळे पार करणे जिकरीचे होऊन त्यांच्याशी सामना करत माझी स्वारी तशीच आपले घोडे दवडत पुढे चालत असते.

पण या सर्व प्रवासामध्ये मला माझ्या बहिण भावांनी शेवटपर्यंत खूप साथ दिली आणि मैलोन मैल धावत सर्व गावांना माझी शुद्ध जल वाटत राहिले सर्वांची तहान भागवत राहिले. त्यावर तिथे जमिनींना आपले पोट भरून घेतले सर्व शेती माझ्यामुळे हिरवेगार दिसू लागते. शहरे अन्नधान्यांनी संपन्न होतात.

नदीचे आत्मवृत्त निबंध 2021 - Nadi ki Atmakatha In Marathi

मनुष्याला आपल्या बुद्धीचा अभिमान आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण तसेच अनेक प्रकल्प वगैरे केले जातात. पण तेही प्रदूषण न करता सर्वांना शुद्ध पाण्याचा उपयोग घेऊ दिला तर जलचर तरी सुखाने जगतील पण पैसे कमावण्या -च्या हव्यासापोटी माझ्या पात्राचे व पाण्याचे प्रदूषण होत आहे. गणपती विसर्जनासाठी आल्यानंतर तसेच इतर वेळीही निर्माल्य माझ्या प्रवाहामध्ये सोडून देतात आणि मला दूषित करतात.

कचरा सुद्धा तुम्ही माझ्या पात्रात टाकता. काही जण तर वाहने सुद्धा माझ्या पात्रातून धूतात खरंतर मला तुम्ही सर्वजण खूपच पवित्र मानतात, पण तुम्हीच माझ्या पवित्र पणाला डाग लावत आहेत. मी डोंगर माथ्यावरून खूप खोल दरीत उडी मारुन डोंगरावरून सोप्या सोप्या मार्गाने येणारच नाही. माणूस असल्याने आता मला जाता येत नाही. अशा अडचणीच्या जागांवरून झाडाझुडपातून या वरून त्या खडकांवर उड्या मारत उसळ्या घेत खाली येईल तिथून रमत-गमत समुद्रात जाते. समुद्रात गेल्यावर तर मज्जाच मज्जा होते.

लहान-मोठी हजारो रंगीबिरंगी मासे पाहायला मिळतात. त्यांच्या अंगावरुन हात फिरवून मी पाहिल मला भितीच वाटणार नाही. कधी समुद्राच्या महाकाय लाटांबरोबर दंगामस्ती करीत तर कधी समुद्राच्या तळाशी असलेल्या खोल भुयारातून एकटीच फिरेल मी नदी बनले तर एक गोष्ट नक्की करीन डोंगरातून उतरताना उड्या मारताना उसळत येईन. तसा गावात आल्यावर मात्र धावणार नाही. गावातून मी संथपणे वाहत जाईल.

माझ्या पात्रात मी लहान-मोठे डोह निर्माण करीन, मग माझ्यासारखीच खूप मुलं घेऊन मनसोक्त होतील. मला त्यांच्याशी खेळायला मिळेल मी माझ्या काठावर मोठी खूप झाडे वाढवीन येणारे-जाणारे वाटसरु मग घटकाभर किंवा क्षणभर माझ्या पाशी विसावा घेतील व पुढे जातील. संध्याकाळी अनेक लोक काठावर येथील माझ्या प्रवाहाचे सौंदर्य आनंदाने पाहता येईल गप्पा मारतील आणि तृप्त होऊन घरी परततील मी नदी बनलो तर नदीच्या काठावरील सर्व परिसर सुजल सुफल बनवेल.

नक्की वाचा – इंदिरा गांधी विषयी निबंध – Indira Gandhi Information In Marathi 2021

मी आता हे मनोराज्य रंगवीत आहे, खरं पण त्यांच्या विपरीत घडलं तर लोकांनी झाडे तोडून टाकली. पर्यावरण उध्वस्त केलं तर मग मी आता कल्पना करते की कोण फिरणार सुद्धा नाही. मला वाटतं लोकांचं आधी प्रबोधनचे केलं पाहिजे. झाडे लावा, झाडे वाचवा हा संदेश सर्वत्र पोहोचला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करायला शिकवलं पाहिजे. त्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले पाहिजे. मगच नदी होण्याचे स्वप्न पाहूया. नदी ( Nadi ki Atmakatha In Marathi ) ही गोड्या पाण्याची बनलेली असते आणि हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित एखाद्या जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते.

अतिप्रचंड नद्यांना नद असे म्हणतात. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रा नदी कमी रुंदीच्या जलप्रवाह आला झरा, नाला किंवा ओढा म्हणतात. नदी म्हणण्यासाठी कोणतेही प्रमाणित नियम नाही. जेथे नदी ( Nadi ki Atmakatha In Marathi ) समुद्राला मिळते तेथे तिची रुंदी जास्त असते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतुर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत होते, त्या जलाशयाला ही खाडी म्हणतात.

नदीचे आत्मवृत्त निबंध 2021 - Nadi ki Atmakatha In Marathi

समुद्रापासून तर दूर असलेल्या मोठ्या जलाशयाला तर तलाव किंवा सरोवर म्हणतात. जलाशय फारच छोटा आणि फक्त पावसाच्या पाण्याने बनलेला असेल तर त्या लाडके म्हणतात. नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले ( Nadi ki Atmakatha In Marathi ) पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वाहत येथे जमा झालेले पाणी काही वेळा बर्फाच्या पठार आतून म्हणजे साठ यातूनही येते.

मी नदी झाले तर ( Nadi ki Atmakatha In Marathi ) … लोकांना पाण्याचे महत्त्व समजू सांगेल व त्यांना शेती टिकवण्यास मदत करेल. माझा प्रवाह मी स्वतः बनवेल जिथे माझी गरज आहे, तिथे नक्की जाईल. मी कधीच विश्रांती घेत नाही, नेहमी वाहत असते. खूप लोक माझ्या पाण्यात विविध प्रकारच्या वस्तू टाकत असतात. त्यामुळे माझे पाणी दूषित होते. मी दूषित झाल्यामुळे तुमचेच आरोग्य धोक्यात येते, असे न करता मला स्वच्छ ठेवत चला म्हणजे तुमचे जीवन निरोगी राहील.

समोर मी समुद्राला मिळत असते. अशा प्रकारे माझे जीवन आहे. तुम्ही सर्वच प्राणी जन्मता आणि मरता पण मी कधीच मरत नाही. मी सदैव वाहत असते. मी मानव समाजाची मोठी सेवा करते. तसेच सर्वच प्राण्यांची देखील तहान भागविते. पक्ष्यांची सुद्धा तहान भागवते. मानव जातीची मोठी सेवा मी करीत असते. त्यांनी माझे आभार मानायला पाहिजेत, पावसाळ्यात तर मी खूप ओसांडून वाहत असते आणि त्यामुळे मला माझ्या काठाच्या वरून मला जावे लागते आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते आणि बहुतेक लोकांचे नुकसान सुद्धा होते.

पण यामध्ये मी दोषी कसे ठरणार? माझे पाणी थांबण्यासाठी तुमच्या सरकारने अनेक जागी मोठे बंधारे बांधले आहेत. कधीकधी मला माझे उग्ररूप सुद्धा धारण करावे लागते. माझ्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो तसेच जे काही शेतकरी करतात त्यांची पिके अधिक जोमाने वाढतात. माझे पाणी माझ्या काठाच्या दोन्ही बाजूंच्या शेतांची सुपीकता वाढविते, तेथे मुबलक पिके वाढतात. देश समृद्ध होतो. लोकांनी माझ्या किनार्‍यावर मोठी शहरे वसविली आहेत.

यातील काही शहरे संस्कृतीची केंद्रे आहेत, काहींना व्यावसायिक महत्त्व आहे, तर काही लोक व्यापार करण्यासाठी सुद्धा माझा वापर करतात. माझ्या पाठीवरून नौका चालवितात आणि मोठ्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. पृष्ठभागावर ते नका आणि स्टीमर चालवतात शेकडो लोक पाण्याने स्नान करतात. माझे पाणी पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरतात.

“तुम्हाला आमचा लेख नदी विषयी आत्मकथा ( Nadi ki Atmakatha In Marathi ) कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

Marathi Nibandhs

नदीची आत्मकथा मराठी निबंध | nadichi atmakatha in marathi.

नदीची आत्मकथा मराठी निबंध | Nadichi  Atmakatha in Marathi

नदीची आत्मकथा मराठी निबंध | Nadichi  Atmakatha in Marathi 

नमस्कार मित्रांनो आज आपण  नदीची आत्मकथा मराठी निबंध , nadichi  atmakatha in marathi   बघणार आहोत., नदीची आत्मकथा, टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते, nadichi atmakatha in marathi language autobiography of river in marathi essay on river in marathi नदीचे अत्मवृत  मराठी निबंध.

' class=

Related Post

झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी

Zadache atmavrutta nibandh in marathi, झाडाचे मनोगत  , झाडाचे मनोगत कसे आहात सर्व, ओळखले का मला मीच तो तुम्हाला उन्हाळमध्ये सावली देणारा भूक लागल्यास फळे खायला देणारा, तहान लागल्यास नारळ पाणी देणारा व देवाला वाहण्यासाठी रंगबेरंगी फुले देणारा सांगा बर आता मी कोण बरोबर ओळखले मी झाड, माझा जन्म लहान अश्या बियापासून होतो, लहान असताना जस सर्वांना जपावे लागते तसेच मला सुद्धा जपावे लागते. कारण मी लहान असताना मला योग्य प्रमाणात पाणी द्यावे लागते, खत द्यावे लागतेज सूर्यप्रकाश माझ्याजवळ पोहोचला पाहिजे. प्राण्यांपासून मला वाचवायला लागते नाहीतर ते येऊन मला खाऊन टाकतात. या सर्वांची काळजी घ्यावी लागते तेव्हा कुठे माझी वाढ होते व मी तुमच्या सेवेला हजर असतो. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); भारतीय सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध माझ्या मुळे सर्व विश्व आहे ही गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. कारण मी निर्माण केलेल्या ऑक्सिजन मुळे सर्व सजीव प्राणी श्वसन करून जीवन जगत आहेत.  परंतु काही समाजकंटक लोक जंगलात जाऊन किंवा गावातील हिरव्या गार ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी झाडांची कत्तल करीत आहेत. काही लोक डोंगराला वणवे लावून छोटी छोटी झाडे जाळून टाकत आहेत. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); तशी भरपूर लोक माझ्यासाठी कष्ट करीत आहेत, अनेक वृक्ष लावत आहेत, त्यामध्ये औषधी झाडे, फुलांची झाडे, फळांची झाडे अनेक वेळी यांचा समावेश होतो, डोंगरावर झाडे मोठ्या प्रमाणात असतील तर जमिनीची धूप रोखली जाते, पाऊस सुद्धा चांगल्या प्रकारे पडतो, प्राणी, पक्षी यांचा वावर वाढतो. मित्र मैत्रिणीनो तुम्ही किमान 1 - 1 झाड लावले तरी आम्हाला समाधान मिळेल  तसेच ओझोनचा थर सध्या कमी कमी होत आहे त्यामुळे global warming चा धोका वाढत आहे तर कृपा करून झाडे लावा झाडे जगवा.   आपण आता परत भेटू कोणत्यातरी वळणावर अचानकपणे धन्यवाद., - मी वृक्ष बोलतोय, संपर्क फॉर्म.

Marathi News

Nadiche Atmavrutta Essay In Marathi | ‘नदीचे आत्मवृत्त’ निबंध मराठी

‘नदीचे आत्मवृत्त’ निबंध मराठी.

Nadiche Atmavrutta Essay In Marathi

Table of Contents

Nadiche atmavrutta essay in marathi in 10 lines, ‘नदीचे आत्मवृत्त’ निबंध मराठी’ १० ओळी मध्ये.

क्रमांक‘नदीचे आत्मवृत्त’ निबंध मराठी’ १० ओळी मध्ये
1.मी नदी बोलतेय. माझे आयुष्य माणसाच्या आयुष्याशी मिळतेजुळते आहे.
2.माझा जन्म एका डोंगरात झाला जिथे डोंगर आणि बगळे राहतात.
3.मी मोठ्या समुद्रात सामील झालो आणि तलावात जाईपर्यंत खोऱ्या आणि कड्या पाडलेल्या तेव्हा मी खूप चैतन्यशील आणि गोंगाटमय होते.
4.नदीत प्रवेश केल्यावर मी खूप शांत आणि संथ झाले.
5.त्याचप्रमाणे, एकदा पुरुष परिपक्व झाल्यानंतर किंवा समजदार झाल्या नंतर अधिक शांत होतात.
6.माझ्यात आणि लोकांमध्ये समानता असूनही, आमच्यात स्पष्ट फरक आहेत.
7.मी अनेक महत्त्वाचे जीवन अभ्यासक्रमही शिकवले आणि माझ्या प्रवाहात अडथळे सुद्धा येतात. मला थांबवण्याचा प्रयत्न करतात.
8.तरी पण मी त्यांना धडा शिकवतो, सर्व अडथळ्यांवर मात करते आणि रस्ता शोधते.
9.जर एखाद्याला त्याचे ध्येय गाठायचे असेल तर मी त्यांना हेच सांगेन कि माझ्यासारखे लवचिक बना म्हणजे तुम्हाला कोणी थांबू शकत नाही.
10.भलेही त्यांचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला असेल, पण लोकांना माझ्यासारखे वाटचाल करावी लागेल. कुठे तरी मार्ग शोधून काढावा लागेल.
  • The Power Of Your Subconscious Mind | हे तुमच आयुष्य कसा बदलू शकते?
  • Mazi Shala Nibandh | माझी शाळा निबंध
  • Best 32 rakshabandhan quotes in marathi | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा
  • Ladki Bahin Yojana Online Apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • नागपूरमधील प्रसिद्ध Ramji Shyamji Pohewala यांचा व्यवसायाचा यशस्वी प्रवास

Related Posts

Fulache Atmavrutta Nibandh

Fulache Atmavrutta Nibandh 2024 फुलाचे आत्मवृत्त निबंध मराठी

pustakachi atmakatha in marathi

Marathi essay on pustakache atmavrutta 2024 | पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी मध्ये |

Leave a comment cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Marathi Moral - मराठी बोधकथा

  • मुख्यपृष्ठ
  • माहिती तंत्रज्ञान
  • मराठी बोधकथा
  • मराठी निबंध
  • अकबर आणि बिरबल गोष्टी
  • मराठी उखाणे
  • _उखाणे नवरदेवासाठी
  • _मजेशीर (Funny) उखाणे
  • वाढदिवस शुभेच्छा
  • _पत्नीस वाढिवस शुभेच्छा
  • _मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा
  • _लग्न वाढदिवस शुभेच्छा
  • _शुभेच्छा आभार संदेश

नदीची आत्मकथा मराठी निबंध Nadichi Atmakatha Essay in Marathi

Nadichi Atmakatha Nibandh in Marathi नद्या म्हणजे आपल्या देशाच्या प्राण आहेत. नद्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनाला जीवन दिले आहे. नद्या आपल्याला हे शिकवतात की जीवन म्हणजे साहस आहे. जीवनामध्ये सतत पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पुढे जात राहावे. नद्यांच्या प्रवाहातील सामर्थवान असलेल्या लाटांच्या मदतीने आपण अधिक सामर्थ्य विकसित करायला पाहिजे. आज नदीची आत्मकथा या निबंधात, भारतातील विविध नद्यांच्या दृष्टीकोनातून तिच्या आत्मकथेची वर्णन केले आहे. (आत्मकथा निबंध मराठी).

नदीची आत्मकथा निबंध मराठी | मी गोदावरी नदी बोलते निबंध | मी नदी बोलते निबंध | मी नदी बोलते आत्मकथा | मी गंगा नदी बोलते मराठी निबंध | nadichi atmakatha nibandh marathi | nadichi atmakatha essay in marathi | nadichi atmakatha in marathi nibandh | आत्मकथा निबंध मराठी

मी नदी बोलते आत्मकथा मराठी निबंध (सोपा)

सर्वांना माझा नमस्कार! मी एक नदी बोलत आहे. माझं नाव इरावती आहे. मला सरिता, तटिनी, तरंगिणी या नावाने देखील ओळखले जाते. माझा जन्म हा एका मोठया पर्वताच्या टोकावर झाला. माझे बालपण डोंगरांच्या कऱ्या-कपारीमधुन हसत आणि खेळत गेले. लहापणी मी खूपच खोडकर होते. एका ठिकाणी थांबणे  मला कधीच जमत नव्हते. हळू हळू निसर्गामधील वृक्षे, वेली-झाडे यांच्या सहवासात राहून मी मोठी झाले. अनके वर्ष पुढे सरत गेली. कालांतराने माझ्या किनाऱ्यावर अनके गावे खेडे आणि शहरे वसली गेली. सर्वांना पाणी देऊन मला फार समाधानी वाटत असे. मला आनंद वाटतो की माझ्यामुळे सर्व माणसे, पशु-पक्षी यांची तहान भागते. माझे पाणी अडवून- जिरवून लोकं शेती देखील करतात, बागबगीचे फुलवतात आणि आपली उपजीविका भागवत असतात. डोंगर-कपाऱ्याच्या संथ अशा प्रवाहातून जाताना सगळ्या प्राणिजन्य-वनस्पतिजन्यांची तहान भागवते. माझ्या सोबतच निरंतर धावत्या माझ्या सोबती नद्या माझ्या प्रमाणेच कधीही थांबत नाहीत. माझा प्रवाह हा नागमोडी वळणाचा असतो अनेक गावातून-शहरातून वाहत जाऊन शेवटी मी समुद्रात विलीन होते.

पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतो मी तुडुंब भरून वाहते राहते. कधी कधी अतिवृष्टीमुळे महापूर येतो. त्यामुळे, माझ्या किनारी वसलेली गावे-शहरे यांचे फार नुकसान होते. काहीवेळेस तर जीवितहानी देखील होते. अतिवृष्टीमुळे होणारी जीवितहानी माझी इच्छा असूनही मला ती थांबवता येऊ शकत नाही, याचे मला खूप दुःख होते. जर पावसाळ्यापूर्वी अतिवृष्टीसाठी लढण्याची तयारी माणसाने जर करून ठेवली तर यातून नक्कीच मार्ग निघू शकतो असे मला वाटते. माणसू-पशु -पक्षी आणि वनस्पतींची निस्वार्थपणे सेवा करणे, त्यांना स्वच्छ पाणी पुरवणे हेच माझे जीवन आहे. यामध्ये मी समाधानी आहे.

सतत प्रवाहासह वाहत जाणे आणि मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-फुले यांना पाणी देणे हाच माझा जीवनाचा सार आहे. यामुळे मला 'माता' म्हणून देखील संबोधले जाते.

मला एक गोष्ट सांगतांना दुःख वाटते की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञाच्या काळात लोकं माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे, माझ्यात सोडलेला    कचरा, सांडपाणी, केमिकल यामुळे मी दूषित होत असते. या जलप्रदूषणामुळे पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांनां स्वतःचा जीव गमवावा लागतो. पण सुदैवाने  काही चांगली लोकं माझं पाणी स्वच्छ, निर्मळ राहावं म्हणून सतत प्रयत्न करीत असतात. स्वच्छता मोहिमांसारख्या अनेक उपाययोजना राबवित असतात. त्यामुळे भविष्यात लोकांना माझं शुद्ध असणं किती गरजेचे याची जाणीव होईल आणि मी दूषित होण्यापासून वाचेन याची मला खात्री आहे.

माझं आत्मवृत्त ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनःपूर्वक आभार! तुम्ही मला नेहमी शुद्ध ठेवण्यासाठी आपापल्या परीने तुमचं योगदान नक्कीच द्याल असा विश्वास आहे.

मी गोदावरी नदी बोलते निबंध

तुम्हाला कदाचित माहीतच असेल की, महाराष्ट्राच्या प्राचीन आणि पवित्र नद्यांपैकी एक आहे 'गोदावरी नदी'. भारत देशाच्या पंधराव्या जलप्रवाही गोदावरी नदीची महत्वपूर्ण भूमिका मानली जाते. गोदावरी नदी विशेषत: महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सर्वात महत्वाच्या नद्यांपैकी एक नदी आहे. चला तर मग वाचकमित्रहो, गोदावरी नदीची आत्मकथा गोदावरी नदीकडूनच जाणून घेऊयात.

नमस्कार मित्रांनो, मी गोदावरी नदी बोलत आहे. माझी आत्मकथा तुम्हाला सांगताना आनंद होत आहे. मी एक भारत देशातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी म्हणून ओळखली जाते. गंगा नदी नंतर मलाही पवित्र नदी म्हणून गणले जाते. मला गौतमी गोदावरी आणि दक्षिण गंगा या नावाने देखील ओळखले जाते. माझा उगम महाराष्ट्र राज्यातील नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर झाला. हे ठिकाण अरबी समुद्रापासून ८० किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार ही पवित्र स्थाने देखील आहेत. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासूनच जवळ असलेले नाशिक हे एक औद्योगिक शहर आहे.

माझ्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर, पुराणकाळात देखील माझा उल्लेख आढळतो. प्रभू श्रीराम वनवास काळामध्ये असताना त्यांनी माझ्या तटावर आश्रम बांधला असा उल्लेख रामायणात केलेला आहे. अगदी पाषाण युगापासून माझ्या खोऱ्यात मानवी वस्ती होती आणि हडप्पा संस्कृतीचा उगम देखील माझ्याच खोऱ्यात झाला होता. गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून गौतम ऋषींनी पापाचे प्रायश्चित केले अशी माझी अख्यायिका सांगितली जाते.

माझी लांबी सुमारे १४६५ किलोमीटर एवढी आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यामधील लांबी ६६८ किलोमीटर आहे. माझे महाराष्ट्रातील खोरे १५३००० चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र भारत देशाच्या १०% तर महाराष्ट्र राज्याच्या ४९% टक्के आहे. मी अग्नेय दिशेला वाहत वाहत आंध्रप्रदेश राज्यामधील राजमहेंन्द्रीजवलील बंगालच्या उपसागरास मिळते. म्हणूनच, मला महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातील जीवन वाहिनी मानली जाते.

महाराष्ट्रातील नाशिक शहरामधील कुंभमेळात नदी तटात केलेल्या स्नानाचे खूप महत्व आहे. माझ्या खोऱ्यात राहणारी लोकं बहुसंख्येने मराठी व तेलुगू भाषिक आहेत.

आंध्रप्रदेशात दर १२ वर्षांनी पुष्करम मेळा माझ्या (गोदावरी) तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे.

माझ्या उपनद्यांबद्दल सांगायचे झाले तर, मी अनेक उपनद्या आहेत. त्यापैकी उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्या म्हणजे प्राणहिता, इंद्रावती, शिवना, कादवा, खांब  इत्यादि आहेत. तर, दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्यापैकी मांजरा, प्रवरा, सिंदफणा, दारणा, बिंदुसरा इत्यादी आहेत.

माझे पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होत असते असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. वाहणारे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी मी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी माझ्या खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे.

दुष्काळी काळात पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर होतात. नदीकाठांवर असलेली अनेक गावे, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणाऱ्या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी माणसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

प्रचंड पावसामुळे अतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि दुष्काळ येतात. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी  वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी देखील होते.

माझ्या किनाऱ्यालगतच्या नगर वस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होत असते. सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते, त्यामुळे पाणीनियोजन बिघडते. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक फॅक्टरी आणि त्यांच्या केमिकलमुळे होत असते. अनेक सामाजिक आणि शासकीय यंत्रणा माझं पाणी शुद्ध व्हावे म्हणून अनेक अभियान राबवित असतात. कालांतराने मी पूर्ण शुद्ध होईन याची खात्री आहे. माझी आत्मकथा ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!

मी गंगा नदी बोलते मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो, मी आहे गंगा नदी. तुम्ही बऱ्याचदा माझ्याबद्दल ऐकले किंवा वाचले नक्कीच असेल. मला अधिक जाणून घेण्यासाठी मी माझी आत्मकथा तुम्हाला सांगत आहे.

माझा जन्म हिमालय पर्वतावरील गंगोत्री या ठकाणी झाला. मी भारतातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे. दक्षिण आशियातील भारत आणि बांगलादेश या देशातून वाहणारी मी एक महत्त्वाची नदी आहे. माझी गंगेची लांबी २,५२५ कि.मी. एवढी आहे. माझ्या अनके उपनद्या आहेत. त्यापैकी उत्तरेकडून येणाऱ्या प्रमुख उपनद्या म्हणजे यमुना, राम गंगा, कर्नाली, ताप्ती, गंडक, कोसी आणि काकशी आणि दक्षिणेच्या पठारामधून येणाऱ्या प्रमुख नद्या म्हणजे चंबळ, सोन, बेतवा, केन, दक्षिणी तोस इत्यादी. यमुना ही माझी सर्वात महत्त्वाची उपनदी आहे.

हिंदू धर्मानुसार मी भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. वेद-पुराणामध्ये अनेक वेळा माझा उल्लेख आढळतो. ब्रह्मापुत्र नदी नंतर मी भारतातील मोठी नदी आहे. हिंदू धर्मीय लोकं मला गंगामाता असंही म्हणतात. त्यांच्यासाठी मी खूप महत्वाची आहे असं ते मानतात.  धार्मिक लोकं माझ्या पात्रात स्नान करणे पवित्र मानतात. माझ्या पाण्याचा वापर शेती आणि वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

माझ्या किनारपट्टीत माशांच्या १४० प्रजाती, ३५ सरपटणारे प्राण्यांच्या ३५ आणि नीलगाय, सांबर, ससा, मुंगूस, चिंकारा (ब्लॅक बक) अशा सस्तन वन्यजीवांच्या ४२ प्रजाती आहेत. डॉल्फिन मासाच्या दोन जाती माझ्या पाण्यात वास्तव करतात. त्यांना गंगेतिल डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय माझ्यामध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत. माझ्या किनाऱ्यावर स्थायिक असेलेल्या लोकवस्ती आणि फॅक्टरीमुळे मला जलप्रदूषणाचा सामना देखील करावा लागतो. माझ्यातील प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे. मात्र, माणसांचा एक वर्ग आहे तो मला स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी सक्रिय असतो. माझ्यातील कचरा, गाळ काढला जातो. तो वर्ग जनमानसात मी स्वच्छ राहावी म्हणून जनजागृती मोहीम देखील करीत असतो. गेल्या दहा वर्षांत माझे पाणी स्वच्छ झाले आहे. भविष्यात मी पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ याची मला खात्री आहे. माझे पाणी स्वच्छ रहाण्यासाठी तुमचेही सहकार्य मिळावे ही सदिच्छा. 

माझी आत्मकथा ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार! (Nadichi Atmakatha in Marathi Nibandh).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या.

  • अकबर आणि बिरबल गोष्टी (7)
  • मराठी उखाणे (4)
  • मराठी निबंध (8)
  • मराठी बोधकथा (4)
  • माहिती तंत्रज्ञान (4)
  • वाढदिवस शुभेच्छा (4)

Marathi Moral - मराठी बोधकथा

आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी इत्यादी आपण लहापणी खूप ऐकल्या आणि वाचल्यादेखील. या गोष्टींच्या खजिन्यातून आपणास जगण्याची एक नवी दिशा मिळत असते. त्यातून मिळणारा बोध यामुळे आपलं पुढील आयुष्य सुखकर व्यतीत होत असतं. या गोष्टींच्या खजान्याला नव्याने उजाळा देण्यासाठी हा ब्लॉगचा प्रपंच ! 'मराठी Moral' या मराठी ब्लॉगमध्ये बोधकथा व्यक्तिरिक्त मराठी निबंध, मराठी सुविचार, मराठी उखाणे, हास्यविनोद, वाढदिवस शुभेच्छा, सणवार शुभेच्छा, माहिती तंत्रज्ञान आणि बरंच काही तुम्हाला वाचायला मिळेल. आभार!

Footer Menu Widget

  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Copyright (c) 2024 Marathi Moral All Right Reseved

Marathi Stop

  • मराठी निबंध
  • _सामान्य विज्ञान
  • _भूगोल

नदीची आत्मकथा मराठी निबंध nadichi atmakatha marathi nibandh

nadiche atmavrutta essay in marathi

Posted by: Daily Marathi

You may like these posts, post a comment, contact form, popular posts.

शेरास सव्वाशेर स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Sheras savvasher swadhyay iyatta tisari balbharati

शेरास सव्वाशेर स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Sheras savvasher swadhyay iyatta tisari balbharati

अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी Anna Bhaunchi Bhet Swadhyay std 8th marathi

अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी Anna Bhaunchi Bhet Swadhyay std 8th marathi

आमचा शब्दकोश स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Amacha shabdkosh swadhyay iyatta tisari balbharati

आमचा शब्दकोश स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Amacha shabdkosh swadhyay iyatta tisari balbharati

  • आठवी पुस्तके PDF
  • आठवी सामान्य विज्ञान
  • आत्मवृत्तपर निबंध
  • इयत्ता आठवी भूगोल
  • इयत्ता आठवी मराठी
  • इयत्ता आठवी माय इंग्लिश
  • इयत्ता चौथी पुस्तके PDF
  • इयत्ता चौथी बालभारती
  • इयत्ता दहावी
  • इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान
  • इयत्ता नववी पुस्तके
  • इयत्ता पाचवी गणित
  • इयत्ता सातवी भूगोल
  • इयात्ता आठवी सुलभभारती
  • कक्षा पांचवी सुलभभारती
  • कल्पणात्मक निबंध
  • तिसरी बालभारती
  • पाचवी पुस्तके PDF
  • प्रसंगलेखन
  • वर्णनात्मक निबंध
  • वैचारिक
  • व्यक्तिचित्रण
  • सहावी पुस्तके PDF
  • सहावी सामान्य विज्ञान
  • सातवी पुस्तके PDF
  • सातवी सामान्य विज्ञान
  • आठवी पुस्तके PDF 1
  • आठवी सामान्य विज्ञान 18
  • आत्मवृत्तपर निबंध 1
  • इयत्ता आठवी भूगोल 8
  • इयत्ता नववी पुस्तके 1
  • इयत्ता सातवी भूगोल 10
  • कल्पणात्मक निबंध 2
  • तिसरी बालभारती 17
  • पाचवी पुस्तके PDF 1
  • प्रसंगलेखन 1
  • मराठी निबंध 9
  • वर्णनात्मक निबंध 7
  • वैचारिक 1
  • व्यक्तिचित्रण 3
  • सहावी पुस्तके PDF 1
  • सहावी सामान्य विज्ञान 16
  • सातवी पुस्तके PDF 1
  • सातवी सामान्य विज्ञान 20

Menu Footer Widget

  • Terms and conditions
  • Privacy Policy

पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध

पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी |Marathi Essay on Pustakache Atmavrutta

Marathi Essay on Pustakache Atmavrutta : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही MpscMarathi Team तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत  पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी . हा एक कल्पनाप्रधान निबंध प्रकार आहे.

तुम्ही Marathi Essay on Pustakache Atmavrutta in English हा निबंध तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. आमच्या वेबसाईटवर इतरही अनेक  Marathi Nibandh   उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता.

पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी

Marathi Essay on Pustakache Atmavrutta 200 Words

मित्रानो ! मी एक पुस्तक बोलतोय. होय, खरंच एक पुस्तक बोलतोय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटत असेल की, एक पुस्तक कसं काय बोलायला लागले? परंतु आजच्या हरवत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मी माझे महत्व आणि माझी उपस्थिती याबद्दल लोकांना सांगण्यासाठी आज बोलायला आले.

मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्या साठी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्या मध्ये सामावलेल्या कित्तेक माहितीचा, ज्ञानाचा संग्रह आहे. माझ्या मध्ये लिहिलेले ज्ञाश हे मर्यादित आहे जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

पुस्तक म्हणून मी माहिती संग्रहित करण्याचे अतिशय उपयुक्त साधन आहे. म्हणूनच माझ्यामध्ये कित्येक पाने जोडलेले असतात व या सर्व पानांचा मिळून मी एक पुस्तक बनतो. माझे ज्ञान लोकांना सहजरीत्या प्राप्त व्हावे याकरिता मला मोठमोठ्या ग्रंथालयांमध्ये संग्रहित करून ठेवले जाते.

माझ्यामुळेच आपल्यातील बहुतांशी लोक शिक्षित झालेले आहे तर काही लोकांनी माझ्यातील ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती केली आहे. मी पुस्तक माझ्यामुळेच लोकांना इतिहासाची माहिती झाली. माझ्या मुळेचं लोकांना आपल्या भारत देशाचा इतिहास माहिती झाला, भूगोल माहिती झाला.

परंतु आजच्या काळातील लोकांसाठी माझे महत्व कमी होत चालले आहे त्यांना पुस्तक म्हणजे केवळ कंटाळवाणे वाटत आहे. आपल्या देशाचा जसजशी प्रगती होत गेली देशांमध्ये नवीन तंत्रज्ञान उदयास आले त्यामध्ये मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप अशा साधनांची निर्मिती झाली. त्यामुळे लोक आज मला पूर्णताचा विसरलेले आहेत. त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर ते मोबाईल चा वापर करून माहिती सहज रित्या उपलब्ध करून घेत आहेत.

परंतु आज जे लोक विसरतात आहे ते मोबाईल आणि कॉम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचन मिळवलेले ज्ञान आणि माहिती जीवनामध्ये कायमस्वरूपी त्यांच्या लक्ष्यात राहते हे आजच्या लोकांना जमत ठाऊकच नाही. परंतु तुम्ही हे विसरता कामा नये की, तुम्हाला जीवनामध्ये एखादे ध्येय साध्य करायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता पुस्तकाचा सहारा घ्यावा लागेल

शेवटी सांगायचे एवढेच की, पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत. पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे इतर कोठेही मिळत नाही त्यामुळे पुस्तके तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

इतर महत्वाचे निबंध  >>

  • फुलाचे आत्मवृत्त निबंध | Fulache Atmavrutta Nibandh
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Shetkaryache Atmavrutta
  • सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Sainikache Atmavrutta

निष्कर्ष: Marathi Essay on Pustakache Atmavrutta

तर विद्यार्थ्यांनो हा होता  पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध . आम्हाला आशा आहे की Marathi Essay on Pustakache Atmavrutta तुम्हाला आवडला असेल.

तुम्हाला ही माहिती/निबंध उपयुक्त वाटल्यास तुमच्या वर्ग मित्रांना नक्की शेअर करा. तसेच, Marathi Essay on Pustakache Atmavrutta PDF किंवा इतर कोणत्याही विषयावर निबंध हवे असल्यास आम्हाला खाली कमेन्ट करून कळवा.

' src=

मराठी व्याकरण, उपयोजित लेखन तसेच विविध विषयांवर उपयुक्त शालेय माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करतो. मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh shala

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh :- पुस्तके हे आपले गुरू असतात. त्यामुळे शिक्षकानंतर जर सर्वात जास्त ज्ञान मिळविण्याचा आपल्यासाठी कोणता स्रोत असेल तर तो म्हणजे पुस्तक. पण हेच पुस्तक जे आपल्याला शब्दरुपी ज्ञान देत असते ते पुस्तक बोलू लागले तर…

नमस्कार मंडळी ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी पुस्तकाचे आत्मवृत्त / मनोगत मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh हा निबंध लिहिला आहे. या निबंधातून मी स्पष्ट केले आहे की जर पुस्तक बोलू लागले तर काय होईल, ते आपल्याशी काय बोलेल.

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh (४०० शब्दात)

Shetkaryache atmavrutta marathi nibandh

मला नवनवीन गोष्टीची आणि सुंदर कवितांची पुस्तके वाचायला खूप आवडतात. त्यामुळे मी शाळा सुटली की नेहमी अर्धा तास शाळेच्या वाचनालयात गोष्टींची आणि कवितांची पुस्तके वाचत बसत असे.

मी एके दिवशी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेतील वाचनालयात पुस्तक वाचण्यासाठी गेलो. तेथील एका कपाटातून पुस्तक काढत असताना चुकून ते पुस्तक माझ्याकडून खाली पडले..तेवढ्यात आई गं…! असा आवाज आला.

त्यामुळे कोण बोलले म्हणून मी इकडे तिकडे पाहत होतो. पण पुन्हा आवाज आला “अरे, इकडे तिकडे काय पहात आहेस. मीच बोलतोय तुझा जवळचा मित्र पुस्तक.” असे बोलून त्याने आपले पुस्तकाचे आत्मवृत्त / पुस्तकाचे मनोगत pustakache atmavrutta marathi nibandh सांगायला सुरुवात केली.

माझे नाव रंजक गोष्टी आहे. मी खूप दिवसांपासून या वाचनालयात पडून आहे. इथे माझी कुठलीही साफ सफाई नव्हती. शिवाय माझी काळजीही कुणी घेत नसे. त्यामुळे खूप धूळ माझ्यावर साचली होती, मी अगदी धुलीखली दबून गेलो होतो.

पण जेंवापासून तू या वाचनालयात यायला लागलास तेंव्हा कुठे माझ्या जगण्याला अर्थ आला. या वाचनालयात एवढी सारी पुस्तके असताना देखील तू वाचण्यासाठी माझी निवड केलीस, तो दिवस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. खरच त्यादिवशी मला स्वतःचा खूप अभिमान वाटला. मी देखील काही लोकांसाठी खूप आवडता आहे, याची मला जाणीव झाली.

माझा जन्म मुबई शहरातील एका पुस्तकाच्या कारखान्यात झाला आहे. तेथेच माझी संपूर्ण रचना तयार करण्यात आली. छपाई मशिनद्वारे माझ्या पानावर छान छान गोष्टी छापण्यात आल्या. सुंदर चित्रांनी युक्त आकर्षक असे माझे मुखपृष्ठ बनवण्यात आले आणि असे माझे रूप तयार झाले.

या वाचनालयात येण्यापूर्वी मी मुबई शहरातील एका पुस्तक प्रदर्शनात ठेवलेला होतो. तेथे नेहमी हजारो लोक यायची. विविध पुस्तके चाचपायची. त्यात एखादे कुणीतरी मलाही उघडून पाहायचे. माझे एकदोन पाने पाहायचे आणि मला तिथेच टाकून समोर जायचे.

कुणीही माझी काळजी करायचे नाही. मी जर खाली पडलो तर मला कुणी उचलायचे देखील नाही. तसेच मला तुडवून अनेक लोक समोर जायचे. माझी काळजी घेणारा मला कुणीही मित्र मिळाला नाही.

पण जेंव्हा पासून मी या शाळेतील वाचनालयात आलो आहे तेंव्हापासून तूच माझा अगदी जवळचा मित्र बनला आहेस. तूच माझ्यावर साचलेली धूळ साफ करून मला वाचनासाठी घेतलेस. मला नेहमी व्यवस्थित माझ्या ठिकाणी ठेवलेस. मी जर खाली पडलो तर मला उचलून माझ्या जागी ठेवलेस. जेंव्हा पासून तू माझा मित्र बनला आहेस तेंव्हापासून मी खूप आनंदात आहे.

तू जेवढी माझी काळजी घेतोस तेवढी काळजी माझी आजपर्यंत कुणीच घेतली नव्हती. त्यामुळे माझी तुझ्याकडे एकच विनंती आहे की तू जे वर्तन माझ्यासोबत केलेस, तेच तू सर्व पुस्तकांशी ठेव. तुझ्याकडे असलेल्या सर्व पुस्तकांची तू अशीच काळजी घे, तुला कधीही ज्ञान कमी पडणार नाही.

देव सर्व पुस्तकांना असाच मित्र किंवा मालक देवो ! असे बोलून त्या पुस्तकाने त्याचे बोलणे थांबवले…

पुस्तकाचे हे शब्द ऐकून मला खूप प्रसन्न वाटले. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh (६०० शब्दात)

मला वाचनाचा खूप छंद आहे त्यामुळे माझ्याकडे जवळपास सर्वच प्रकारचे पुस्तके आहेत. तसेच माझ्या आवडीच्या काही कादंबऱ्या देखील माझ्याकडे आहेत. मी नेहमीप्रमाणे रविवारी माझे पुस्तकांचे कपाट साफ करत होतो. माझे सर्व पुस्तके व्यवस्थित क्रमवार लावत होतो. तेवढ्यात माझी नजर एका पुस्तकाकडे गेली, त्यावर खूप धूळ बसलेली होती. मी ते पुस्तक साफ केले आणि वाचण्यासाठी टेबलावर ठेवले.

मी ते पुस्तक खूप दिवसापूर्वी घेतलेले होते पण काही कारणास्तव अर्धेच वाचलेले होते. ते पुस्तक इतिहास या विषयाचे होते. ते पुस्तक वाचत असताना मला अचानक आवाज आला. नमस्कार ! मी पुस्तक बोलतोय.. असे बोलून पुस्तकाने त्याचे आत्मवृत्त ( pustakache atmavrutta marathi nibandh ) सांगायला सुरुवात केली.

माझं नाव प्राचीन भारताचा इतिहास असे आहे. माझा जन्म पुण्यातील एका पुस्तक निर्मिती कारखान्यात झालेला आहे. दोन तीन लेखकांनी मिळून माझी निर्मिती केलेली आहे.

सुरुवातील माझे पाने एकत्रित करून त्यावर छपाई मशीन द्वारे लेखकांनी लिहिलेले शब्द छापले गेले. नंतर माझ्या सर्व पानांना एकत्रित टाचन पिन द्वारे जोडले गेले. त्यावेळेस मला फार वेदना झाल्या. कारखान्यात माझ्या सारखीच अनेक पुस्तके छापली जास्त होती.

नंतर आम्हा सर्वांना संच करून पुस्तकाच्या दुकानात विकण्यासाठी पाठवण्यात आले. मी पुण्यातील आप्पा बळवंत चौक येथील एका मोठ्या पुस्तक दुकानात पोहचलो. मला खूप आनंद झाला. तेथे इतर खूप सारे पुस्तके होती. प्रत्येकाचे नाव वेगवेगळे होते. मला त्या पुस्तकातील एका रखाण्यात ठेवण्यात आले.

त्या दुकानात दररोज खूप सारे लोक यायचे, त्यांना हवी ती पुस्तके विकत घ्यायचे आणि निघून जायचे. ज्या पुस्तकांची विक्री व्हायची त्यांना नवीन मालक मिळत असे आणि त्यांची त्या दुकानातून सुटका देखील होत असे त्यामुळे त्या पुस्तकांना खूप छान वाटायचे.

माझी जेंव्हा निर्मिती झाली तेंव्हा मला वाटले होते की माझ्यावर लिहिलेला इतिहास वाचण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्सुकता असेल मला लवकरच नवीन मालक मिळेल. पण तसे काहीच झाले नाही. मी खूप दिवसापासून याच दुकानात धूळ खात पडून होतो.

मला नेहमी वाटायचे असा एखादा तरी व्यक्ती असेल ज्याला माझ्यावर लिहिलेला शुर वीरांचा इतिहास वाचायला आवडेल. मी नेहमी त्या व्यक्तीची म्हणजे माझ्या नवीन मालकाची वाट पाहत असे .

एका दिवशी माझ्या शोधात तू तिथे आलास. माझी विचारपूस केलीस आणि मला त्या दुकानातून तुझ्या घरी घेऊन गेलास. माझी त्या दुकानातून सुटका झाली होती आणि मला एक नवीन मालक मिळाला होता. त्यामुळे मी अगदीच आनंदात होतो.

मला वाटले होते तू माझे नियमित वाचन करशील, माझी काळजी घेशील आणि माझ्यावर आता धूलही साचून राहणार नाही. सुरूवातीला तू मला घरी आणल्यानंतर तू देखील खुप खुश होतास आणि माझ्यावरील इतिहास वाचायला उत्सुक देखील !

पाहिले आठ – दहा दिवस तू माझे नियमित वाचन केलेस, माझी काळजी घेतलीस, माझा पुष्टा खराब होऊ नये म्हणून मला कव्हर लावलेस. माझे वाचन झाले की तू मला व्यवस्थीत टेबलावर ठेऊन देत असे.

पण त्यातच तुझ्या परीक्षा जवळ आल्या होत्या त्यामुळे तू मला पुस्तकाच्या कपाटात ठेवलेस आणि तुझा परीक्षेचा अभ्यास करायला लागलास. मला वाटले होते की तू परीक्षा संपल्या की लगेच मला वाचण्यासाठी बाहेर काढण्यात येईल.

पण तसे काही झाले नाही. तुला माझा विसर पडला. तू मला तसेच अर्ध्यावर सोडून इतर पुस्तके वाचण्यास सुरुवात केलीस. त्यामुळे मला खूप दुःख झाले. मी पूर्वीप्रमाणेच एका कपाटात कैद झालो, माझ्यावर धूळ साचायला सुरू झाली. धुळीने माझे अंग अगदी घान झाले होते, माझा जीव या कपटामध्ये गुदमरत होता. मला वाटले होते माझा याच कपाटात शेवट होतो की काय ?

पण आज पुन्हा योगायोगाने आपली भेट झाली. तुला माझे स्मरण झाले आणि तू मला साफ करून परत वाचण्यासाठी बाहेर काढलेस. नाहीतर मला वाटले होते की मला आता कुणीही वाचणार नाही. माझ्यावर धूळ बसून, माझे पाने कुईजून माझा अंत होणार. येथेच माझा शेवट होणार.

पण आज तू मला पुन्हा मुक्त केलेस त्यामुळे मी खूपच आनंदीत आहे. पण तुला माझी एक विनंती आहे, माझं एकशील का ?

माझी तुला एवढीच विनंती आहे की तू हे पुस्तक वाचून झाल्यास कृपया कपाटात किंवा अशा ठिकाणी मला ठेऊ नकोस जेथे माझ्यावर धूळ बसेल. त्यापेक्षा तु असे कर की हे पुस्तक तू तुझ्या अशा मित्राला दे की त्याला माझ्यावर लिहिलेला इतिहास वाचण्यात उत्सुकता असेल आणि त्याही मित्राला विनंती कर त्याचे पण वाचून झाल्यास त्याच्या पुढील मित्राला हे पुस्तक दे.

त्यामुळे मी नेहमी वाचला जाईल. मी कुठे कैदही होणार नाही आणि माझ्यावर धुळही साचणार नाही ! येवढे बोलून पुस्तकाने त्याचे बोलणे थांबवले…

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला पुस्तकाचे मनोगत / पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakachye atmavrutta marathi nibandh या विषयावर दोन निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

पुस्तकाचे आत्मवृत्त pustakachye atmavrutta marathi nibandh हा लेख तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • नदीचे आत्मवृत्त / नदी बोलू लागली तर…मराठी निबंध
  • मी शिक्षक झालो तर…मराठी निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Clickcease

पुस्तकाचे आत्मवृत्त/आत्मकथा निबंध |Marathi Essay On Pustakache Atmavrutta

Marathi Essay On Pustakache Atmavrutta – पुस्तकाचे आत्मवृत्त /आत्मकथा /आत्मचरित्र या विषयी मराठीत निबंध लिहणार आहे. हा निबंध सर्व शालेय मुलांसाठी उपयोगी नक्कीच पडेल.आणि इतर लोकांसाठी पण हा खूप महत्वपूर्ण असा निबंध आहे. या निबंध लेखनातून पुस्तकाची ओळख आणि खरी किंमत तुम्हाला समजणार आहे. तर चला पुस्तकाची आत्मकथा या विषयी बघूया.. Pustakachi Atmakatha in Marathi

Marathi Essay On Pustakache Atmavrutta | Pustakache Atmavrutta Marathi Nibandh | Pustakachi Atmakatha in Marathi

Marathi Essay On Pustakache Atmavrutta | पुस्तकाची आत्मकथा

माझे नाव पुस्तक आहे. पुस्तक म्हणजे ज्ञानचे भंडार आहे. माझी जन्म कहाणी मनोरंजक विषय आहे.

लेखकाच्या मनात येणारे काल्पनिक विचार आणि खऱ्या जीवनात आलेले अनुभव त्याच्या मनात रुजत असतात आणि त्यांना व्यक्त करण्यासाठी माझ्या माध्यमातून एक सुंदर आकार देतात. लेखकाच्या मनातील सुंदर विचार, मनो भावना, आणि त्याच्या आयुष्यात आलेले अनुभव पुस्तकाच्या प्रत्येक पानांत उमटत असतात. पुस्तकातून प्रत्येक गोष्टीचे परी उत्तर मिळता येते, शालेय गोष्टीची माहिती, तर कधी कधी जीवनाचे धडे,आणि मनोरंजन होते. माझ्यामुळे सर्व वाचकांपर्यंत महत्त्वपूर्ण ज्ञान पोहोचवणे हा शक्य होते.माझ्या वास्तव्याची सुरुवात लेखकामुळे झाली आहे त्यांनी माझ्या खूप कष्ट केले आधीच्या काळात माझे महत्व फक्त एका कागदावरच होते नंतर अनेक वर्षानी मला पुस्तकाच्या रूपात आणले इथूनच माझा हा खास प्रवास सुरू झाला.

माझे पुस्तक छापण्यासाठी कारखान्यात गेले त्यांतर विक्रीसाठी बाजारात आले दुकानातून शाळा, महाविध्यालये, घरोघरी, ग्रंथालय ,वाचनालय पर्यत मी पोहचले हळहळू माझी ओळख वाढत गेली.मी कित्येक जणांचा मित्र झालो. माझ्या सहवासात बऱ्याच जणांचा राहायला आवडायला लागले. प्रत्येकाच्या घरच्या आलमारीत माझ्यासाठी जागा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. मला सगळे जण वाचायला लागले. माझी ओळख वेगवेगळ्या पुस्तकाच्या नावाने झाली त्यामुळे मी प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध झाले. त्यामुळे वाचका पर्यंत मी सहज पोहचले. माझ्यामुळे प्रत्येक घरादारात वाचना आवड निर्माण झाली,माहिती नसणारे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहचले आणि जेव्हा मला कोणी मन लावून वाचते ना तेव्हा मला खूप जास्त आनंद होतो त्यांना माझी खरी किंमत समजलेली असते.त्याचे आयुष्य माझ्यामुळे घडत असते.

पण बरेच जण असेही असतात ज्याना पुस्तकची काहीच किंमत नसते. हे मी माझ्या वाईट अनुभवावरुन सांगत आहे.काही लोक माझी खरेदी करत असतात पण माझी नीट काळजी घेत नाही मला व्यवथित ठेवत नाही. माझी पाने वेडीवाकडी करून ठेवतात तर कधी फाडून फेकून देतात. पेनाने माझ्यावर रेगा उंमटवतात त्यामुळे मी नीट नेटका दिसत नाही. कुठेतरी एका कोप-याशी असतो तिथे कोणाच लक्ष सुद्धा नसते. असे बरेच अनुभव मी घेत असतो. लेखक आणि माझे सुंदर नाते आहे. त्यांनी माझ्यासाठी कष्ट केले मी पाहलेले आहे.माझ्यावर असलेले प्रेम हे मला ते लिहत असताना समजते. ते माझी ओळख निर्माण करत असतात. आज मी त्याच्या मुळे अस्तित्वात आहे.

प्रत्येक पुस्तकाची एक वेगळी ओळख असते. त्या पुस्तकाचे आत्मचरित्र त्याच्या विशिष्ट शैलीचे, भाषेचे, आणि विचारसरणीचे छानणी केलेले असते. काही पुस्तक हे सध्या सोप्या भाषेत लिहलेले असते जेणे करून प्रत्येकाला वाचायला सोपे जाईल, तर काहींमध्ये पुस्तकामध्ये कठीण भाषेत लिहलेले असते. लेखकाची लेखनशैली, त्याच्या काल्पनिक विचारा मधली पात्रांची उभारणी, आणि कथेची मांडणी ही त्या पुस्तकाच्या वैशिष्ट्या वर असते. प्रत्येक पुस्तकाची एक विशेष ओळख असते, जे त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवत असते.

एक पुस्तक हे वाचकाचे दृष्टीकोण बदलत असतात म्हणून वाचकाचा दृष्टीने महत्वाचा असतो. प्रत्येक गोष्ट ही त्या त्या वाचका साठी आवश्यक असते त्यांना अनुसरून लेखन हे पुस्तक लिहत असतात. लेखकाने लिहलेले हे पुस्तक कोण वाचणार कोणत्या माध्यमातून हे पुस्तक लिहलेले गेले आहे. आणि त्याचा होणारा परिणाम हे एका पुस्तकाच्या लेखकांवर अवलंबून असते..ह्या पुस्तका मागे प्रत्येक लेखकांची मेहनत असते.

मी पुस्तक तुम्हाला माझ्या आत्मवृत्तातून सांगत आहे की तुम्ही लेखकाचे विचार आणि भावना समजून घ्यावे, आज आत्मवृत्ता मुळे माझी आणि माझ्या लेखकाची किंमत आणि ओळख तुम्हाला चांगलीच पटली असेलच. मी प्रत्येक वाचकासाठी आणि लेखकासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. लेखकांच्या माध्यमतून मी घडले, त्यांचे खूप खूप मनापासून आभार आहे. आणि माझ्या माध्यमातून तुम्ही घडत असता त्यांमुळे तुम्ही आकाशात उंच भरारी घेत असता, तंत्रज्ञानासंबंधी व सर्व इतर माहीती माझ्या मुळे तुमच्या पर्यंत येते.जसे शाळेतले शिक्षक आपले गुरु असतात तसाच मीही तुमचा गुरुच आहे, शिक्षक माझ्यामुळे घडलेले असतात आणि तुम्हाला पण माझ्यामुळे घडवत असतात. तर आम्ही दोघेही एक समानच आहोत अश्या प्रकारे माझी आत्मकथा मी व्यक्त केली आहे.

आपल्या या ज्ञानाचे भंडार असेच पुढे कायम चालू ठेवण्यासाठी प्रत्येकाला एक तरी पुस्तक नक्कीच वाचायला लावा..

तर आज आपण (  Marathi Essay On Pustakache Atmavrutta ) पुस्तकाची आत्मकथा या विषयीवर हा निबंध लिहलेला आहे. लेखक आणि पुस्तक याच्यांमुळे पुस्तकाची खरी ओळख या जगाला झाली आहे.ह्या पुसकाचे विशेष महत्व आणि आत्मकथा जाणून हा निबंध लिहलेला आहे.  Pustakachi Atmakatha in Marathi , Pustakache Atmavrutta Marathi या सर्वाचा समावेश ह्या निबंधात केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही हा निबंध नकीच वाचा आणि तुमच्या शालेय जीवनात म्हणजेच निबंध लेखन उपयुक्त येईल असा हा लेख आहे. आवडल्यास तुमच्या सर्व मित्र मैत्रीणी नक्कीच पाठवा.

अश्याच छान छान निबंध लेखनासाठी आमच्या  lekhmarathi.com  या वेबसाइट ला भेट द्या….

आणखी हेही वाचा–  Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द

आणखी हेही वाचा – Mazi Shala Nibandh in Marathi | माझी शाळा निबंध

आणखी हेही वाचा – Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध

आणखी हेही वाचा – मराठी निबंध पावसाळा | Pavsala Nibandh in Marathi Essay

Leave a Comment

COMMENTS

  1. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध

    नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा नदी बोलू लागली तर…मराठी निबंध nadiche atmavrutta marathi nibandh :- नदी ही निसर्गाने मानवास दिलेली सर्वोत्तम भेट आहे.नदी ही मानवासाठी ...

  2. नदीची आत्मकथा/मनोगत/आत्मवृत्त मराठी निबंध

    autobiography of a river in marathi, nadi che atmavrutta, Nadi ki atmakatha in marathi नदीची आत्मकथा मराठी निबंध, नदीचे आत्मवृत्त ... nadiche atmavrutta; ... Tags: निबंध Marathi essay. Facebook; Twitter; Mohit patil. मित्रहो, माझे नाव ...

  3. नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी Nadichi Atmakatha in Marathi

    नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी - Nadichi Atmakatha in Marathi Nadiche atmavrutta in marathi. नदी हा शब्द जरी तुम्हाला ओळखीचा वाटत असला तरी आज मी तुम्हाला नदी हिची आत्मकथा सांगणारा आहे.

  4. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध

    Set 2: नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध - Nadiche Atmavrutta Nibandh Marathi. Set 3: नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध - Nadiche Atmavrutta Nibandh Marathi. Set 4: माझ्या गावची नदी मराठी निबंध. Set 5: मी ...

  5. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध Nadiche Aatmavrutta Marathi Essay

    Nadiche Aatmavrutta Marathi Essay: लोक म्हणतात की जसेजसे वय वाढते तसतसे एखादी व्यक्ती मोठी होते, परंतु माझा यावर विश्वास नाही. हजारो वर्षे निघून गेली आहेत, परंतु काळाचा ...

  6. नदीची आत्मकथा मराठी निबंध

    Set 2: नदीची आत्मकथा मराठी निबंध - Nadichi Atmakatha Marathi Nibandh. मुलांनो, मला ओळखलेत का? अरे, मी तुमच्या गावाच्या मध्यातून वाहणारी नदी.

  7. नदीचे आत्मवृत्त निबंध 2021

    नक्की वाचा - पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021. नक्की वाचा - माझे गाव मराठी निबंध मला अनेक भाऊ-बहिणी येऊन मिळायचे त्यामुळे माझा वेग वाढतच असते.

  8. नदी ची आत्मकथा निबंध

    तर मित्रांनो हा Nadi chi Atmakatha Marathi Nibandh कसा वाटलं कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे सुद्धा असाच नदीवर एखादा निबंध असेल तर कंमेंट करून नक्की सांगा.

  9. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A River Essay In Marathi

    नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A River Essay In Marathi { ४०० शब्दांत } सर्वाना नमस्कार, आपण मला ओळखलात का? मी एक नदी आहे. माझे नाव सिंधु नदी असे आहे.

  10. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध

    नदीची आत्मकथा निबंध मराठी भाषेत | मी नदी बोलतेय.....| Essay on NADI CHI AATMAKATHA | नदीचे ...

  11. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध

    नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध | nadiche atmavrutta marathi nibandh----- मराठी निबंधhttps://y...

  12. नदीची आत्मकथा मराठी निबंध

    essay on river in marathi नदीचे अत्मवृत मराठी निबंध नेहमी वाहत राहणे ,सर्वांना माझे पाणी पाजून मनुष्य प्राणी पशू-पक्षी यांना तृप्त करीत राहणे हेच ...

  13. झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी

    थोडे नवीन जरा जुने. zadache atmavrutta nibandh in Marathi - झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी - झाडे लावा झाडे जगवा - निसर्गाचे लेणे म्हणजेच हे वृक्ष.

  14. मनोगत / आत्मवृत्त

    नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा नदी बोलू लागली तर…मराठी निबंध nadiche atmavrutta marathi nibandh :- नदी ही निसर्गाने मानवास दिलेली सर्वोत्तम भेट आहे.

  15. Nadiche Atmavrutta Essay In Marathi

    'नदीचे आत्मवृत्त' निबंध मराठी Nadiche Atmavrutta Essay In Marathi In 10 Lines 'नदीचे आत्मवृत्त' निबंध मराठी' १० ओळी मध्ये Nadiche Atmavrutta Essay In Marathi

  16. नदीची आत्मकथा मराठी निबंध Nadichi Atmakatha Essay in Marathi

    नदीची आत्मकथा मराठी निबंध Nadichi Atmakatha Essay in Marathi. Prakash Naame सप्टेंबर ०४, २०२३. Nadichi Atmakatha Nibandh in Marathi नद्या म्हणजे आपल्या देशाच्या प्राण आहेत. नद्यांनी ...

  17. नदीची आत्मकथा मराठी निबंध, Nadichi Atmakatha Marathi Nibandh

    मला आशा आहे की आपणास नदीची आत्मकथा मराठी निबंध हा लेख (nadichi atmakatha Marathi nibandh) आवडला असेल.

  18. नदीची आत्मकथा मराठी निबंध nadichi atmakatha marathi nibandh

    सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी Surya ugavala nahi tar nibandh in marathi July 25, 2022 पाणी किती खोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता तिसरी बालभारती Pani kiti khol iyatta tisari balbharati swadhyay

  19. Essay on Nadiche Aatmvrutt|मी नदी बोलतेय|नदीचे आत्मवृत्त

    Essay on Nadiche Aatmvrutt|मी नदी बोलतेय|नदीचे आत्मवृत्त#essay#Madhaviscreativityvideo ...

  20. (बेस्ट) पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध

    Marathi Essay on Pustakache Atmavrutta: पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे इतर कोठेही मिळत नाही त्यामुळे पुस्तके तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

  21. पुस्तकाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध Pustakache Atmavrutta Nibandh In Marathi

    Pustakache Atmavrutta Nibandh In Marathi विद्यार्थी आणि मुलांसाठी इथे पुस्तकाचे आत्मवृत्त, आत्मचरित्र, मनोगत वर मराठीमध्ये निबंध लिहित आहेत. हे निबंध नक्कीच

  22. पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh

    पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh (४०० शब्दात) शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध. मला नवनवीन गोष्टीची आणि सुंदर कवितांची ...

  23. पुस्तकाचे आत्मवृत्त/आत्मकथा निबंध |Marathi Essay On Pustakache Atmavrutta

    Pustakachi Atmakatha in Marathi, Pustakache Atmavrutta Marathi या सर्वाचा समावेश ह्या निबंधात केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही हा निबंध नकीच वाचा आणि तुमच्या शालेय जीवनात ...