15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi
- Chetan Jasud
- July 9, 2021
- मराठी निबंध
Independence Day Essay in Marathi: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्त सम्पूर्ण भारतात विविध कार्यक्रम घेतले जातात. या दिवशी शाळांना सुट्टी जरी असली तर शिक्षक आपल्याला या दिनानिमित्त निबंध किंवा भाषणे प्रस्तुत करायला सांगतात. या साठी मी या पोस्टमध्ये स्वातंत्र्य दिन विशेष मराठी निबंध प्रस्तुत करीत आहे जर आपल्याला भाषणे हवी असतील यात आमच्या मराठी भाषणे या भागाला भेट नक्की द्या. सदर निबंध दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिला आहे. एक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य वीरांनी कसे कष्ट केले हा एका भागात लिहिला आहे तर दुसऱ्या भागात सध्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन (Indian Independence Day) कसा साजरा केला जातो हे लिहिले आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | 15 August Marathi Essay ( निबंध नं. १)
Independence Day Essay in Marathi
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जन शासनातळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..
15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले. पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. खूप हालअपेष्टा सहन करून हा दिवस आज आपण पाहत आहोत. भारतमातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते. हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर आपला तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला जातो. देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहन केले जाते.
इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९ शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ठेवले होते. त्यांचे स्वसंरक्षणाचे हक्क काढून घेतले. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांनी १८५७ चा उठाव केला पण त्यामुळेही इंग्रजांच्या नितीमध्ये काही फरक पडला नाही परंतु या उठावामुळे राष्ट्रभक्तीची भावना भारतीयांच्या मनात तीव्र झाली. बऱ्याच ठिकाणी मोठे उठाव झाले. ते इंग्रजांनी सैन्यबळाचा वापर करून दडपून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विद्रोहाला स्वातंत्र्य उठाव असे नाव दिले. १८५७ उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले त्यामुळे इंग्रजांनी त्यांची व्यवस्था आणखीनच शिस्तीची करत फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला व हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडणे चालू केले. दीडशे वर्ष आपण अनंत हालअपेष्टा सहन केल्या. तेवढ्या काळात आमचा इतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनी केले. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुणांना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकऱ्यांना यांनी खूप लुबाडले. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, स्वतःच्या चहाच्या माल्यांची भरभराट व्हावी म्हणून भारतीयांना चहाचे व्यसन लावले. निळीचे उत्पादन करण्याची सक्ती केली. भारतातील कच्चा माल स्वस्तात विकत घेऊन स्वतःच्या देशातील पक्का, यंत्रावर बनवलेला माल चढ्या किमतीमध्ये भारतामध्ये विकला त्यामुळे देशी कारागीर हवालदिल झाले. त्यांच्या हाताला काम मिळेनासे झाले. अनेक जण जमिनीवर कर्जे घेऊन कर्जबाजारी झाली. कित्येकांनी जमिनी विकल्या. अशा प्रकारे इंग्रजांनी ऐन दुष्काळाच्या वेळीही काही उपायोजना केली नाही. भारतीयांचे ब्रिटिशांनी खूप हाल केले. इंग्रजांचा हा धुर्तपणा काहींनी ओळखला होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध शास्त्र उभारले त्यामध्ये तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मी बाई, नाना साहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. क्रांतिकारक होते. त्यांनी आपला निषेध शास्त्रांद्वारे नोंदविला. काहींनी इंग्रजांची हत्या केली तर काही लोकजागृती करत लोकांच्या मनात स्वातंत्र्यविषयी तीव्र भावना जागी केली. रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी लेखणी हातात घेतली. त्यांनी वाणीचा आणि लेखणीचा वापर करून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम याची जनतेला जाणीव करून दिली. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय जनतेला त्यांची स्थिती सुधारण्यासाठी या लोकांनी प्रेरणा , जाणीव करून दिली. ‘ स्वातंत्र्य हि काही भीक मागून मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी इंग्रज सरकारला जाब विचारला पाहिजे’ अशा प्रकारे क्रांतिकारकांनी तरुणांना प्रेरणा दिली. “बंदिवानही भारतमाता आज फोडीते टाहो, मातेच्या स्वातंत्र्याला घरदार सोडूनि याहो” अशा प्रकारे आव्हान करून सर्वांना या लढ्यात क्रांतिकारक सामावून घेत होते.
टिळक आणि सावरकरांनी आपली उमेदीची वर्षेच तुरुंगात घालवली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजींनी जनतेला सत्याग्रह आणि अहिंसा या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर स्वदेशी, स्वावलंबन, असहकार या मार्गानेही इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचे आवाहन केले. सरकारी जुलमीकायदे, अन्याय, नोकऱ्या, दडपशाही या विरुद्ध सत्याग्रहाची मोहीम गांधीजींनी सुरु केली. गांधीजींना या कमी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ. अनेक नेत्यांनी सहकार्य केले. सुभाषचंद्र भोस यांनी इंग्रजांच्या विरोधात ‘आझाद हिंद सेना’ उभारली.
१५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य मिळाले खरे पण या स्वातंत्र्याला गालबोट लागले ते फाळणीचे. भारताचे दोन तुकडे झाले. एक हिंदुस्थान आणि एक पाकिस्तान. मुस्लिम लीग च्या मागणीमुळे भारताची फाळणी झाली. त्यावेळी खूप ठिकाणी हिंसाचार झाला. त्यातूनही आपला भारत देश सावरला आणि पुढे जात राहिला. आणि जगाला शांतीचा संदेश देतच राहिला. देशाला सावरण्यासाठी नेतेमंडळी झटत राहिली. तुलसीदासजी म्हणतात, ‘पराधीन सपनेहू सुखानाही’ म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नातदेखील सुख नसते. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासियांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे. आपले हे सौभाग्याचं आहे की आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्म घेतला आणि स्वातंत्र्याच्या या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या भारताला सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे. आणि आपल्याला खरा स्वातंत्र्याचा अर्थ जगभर पसरवायचा आहे. शांतीचा संदेश द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी असेल प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसोबतच किंबहुना त्याहीपेक्षा जास्ती आपल्या कर्तव्यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे आणि त्याचे पालन करणेही गरजेचे आहे, तरच आपला देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. अनेक आव्हाने पेलायची आहेत आज स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करताना आणि आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना हि आव्हाने पेलण्याच्या जिद्दीला,एक समाज म्हणून आपल्या एकसंध प्रयत्नांना व लोकशाही मूल्यांना अधिक बळकट करण्याचा, त्यांना बळ देण्याचा निर्धार करूया.
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी, ज्यांनी भारत देश घडविला… भारत देशाला मनाचा मुजरा…
स्वातंत्र्य दिवस मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi Language (निबंध नं. २)
15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त झाला. या दिवसाची आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो . स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदे आपण बनवले. विविधतेत नटलेला भारत देश खूप जणांच्या बलिदानाने आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आपल्याला आता कोणाचीही बंधन नाही. कोणाच्याही अधिपत्याखाली आपला भारत देश नाही. ताठ मानेने जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन च्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले राष्ट्रपती माध्यमातून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये देशात काय काय सुधारणा झाल्या आणि इथूनपुढे काय करणार आहोत, कशाप्रकारे करणार आहोत या विषयी सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहन होते ते देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होते. त्यानंतर तिरंग्याला सलामी देऊन जन-गन -मन हे राष्ट्रगीत म्हणले जाते. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये राहून “झेंडा उंचा रहे हमारा” हे गीत सामुदायिकपणे म्हणायचे असते. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात. नवीन योजनांची घोषणा केली जाते. पंतप्रधान देशवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता करतात.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी दिल्लीमध्ये म्हणजेच आपल्या राष्ट्रीय राजधानीत तसेच सर्व देशांच्या शाळा, महाविद्यालये, कार्यालये या ठिकाणे नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. आसमंत देशभक्तीपर गीतांनी आणि भाषणांनी भरून जातो. लहान मुलांची सकाळी प्रभात फेरी निघते. छोटी छोटी मुले पूर्ण गणवेशात शाळेत हजर असतात. लहान मुलांना हातात झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळीकडे झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. सैनिकांच्या संचालनाचे कार्यक्रमही पाहण्यासारखा असतो. तिन्ही दलाचे सैनिक त्यांच्या कवायती सादर करतात. ते पाहताना उर अभिमानाने भरून जातो. आणि त्यातून जे प्रोत्साहन मिळते ते काही वेगळेच असते. लहान मुलांनाही याचे खूप अप्रूप वाटते आणि तेही देशासाठी काहीतरी करायची स्वप्न पाहायला लागतात. आपला तिरंगा आसमंतात फडकताना आपल्याला काही संदेश देतो असेच वाटते. वर केशरी, मध्ये पंधरा आणि खाली हिरवा तसेच मध्ये पांढरा रंग आपल्यात नवी ऊर्जा निर्माण करतो. केशरी रंग बलिदानाचे प्रतीक असतो. पांढरा रंग पवित्रतेचे संदेश देतो. हिरवा रंग समृद्धी दाखवतो. मध्ये असणारे अशोक चक्र विकासाचे प्रतिक दर्शवतो.
स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवताना खूपच अभिमान वाटतो. त्या दिवशी भारत सरकार अनेक मान्यवर व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतात.देशातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस असतो. सारा देश हे कौतुक आपल्या दूरदर्शन वर पाहत असतो. बऱ्याच लोकांना दिल्ली ला जाऊन हा कार्यक्रम साजरा करणे प्रत्यक्षात शक्य होत नसल्याने दूरदर्शनच्या माध्यमातून हा कार्यक्रम दाखवण्याची उत्तम सोय केलेली असते. हे पाहताना त्या व्यक्तींविषयी आदर अजून वाढतो आणि अभिमानही वाढतो. कितीही कठीण परिस्थिती असूदेत सगळीकडे अंधकार असला तरी अशाही परिस्थितीत अनेक सामन्यातून असामान्य असलेल्या व्यक्ती पुढे येतात हे आमचे वैशिष्ट्य आहे. हि माणसेच आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत. आणि त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्व नागरिकांमध्ये राष्टाविषयी प्रेम आणि अभिमान जागृत करण्यासाठी तसेच सर्वांमध्ये एकीची भावना प्रज्वलित करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन हा दिवस साजरा करायलाच हवा. एकी आणि देशाभिमान यांच्या जोरावर आपण आपल्या देशापुढील अनेक प्रश्न समाधानकारकरित्या सोडवू शकतो. स्वातंत्र्य दिन हा असा दिवस आहे कि जो सर्व धर्म-पंथ-भाषेच्या नागरिकांना जोडतो. या सगळ्यामुळे झालेला भेद मिटविण्याचे सामर्थ्य या दिवसात आहे. त्यामुळे जो देश “ विविधतेमध्ये एकटा” चा अभिमान धरतो त्या भारतासारख्या देशाला हा दिवस फार महत्वाचा आहे व त्यामुळेच तो दरवर्षी आनंदाने आणि अभिमानाने साजरा होणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांनी देशासाठी केलेल्या त्याग, बलिदानाची जण आहे व ती लक्षात ठेवून आपण आपल्या पूर्वपिढ्यानी आयुष्य वेचत मिळविलेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास सक्षम आहोत व आमच्याकडे आता कुणी तिरकस नजरेने बघू नये हे जगास दाखवायला तरी आपण हा विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे.
घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंचच उंच जय हिंद जय भारत या जयघोषाने गर्जु दे सारा आसमंत !
इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :
१. शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)
२. व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)
३. निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)
४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये
५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)
६. निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)
मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.
Related articles
New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध
- May 7, 2023
माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध
- February 5, 2023
वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध
Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या
- January 30, 2023
शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer
- January 28, 2023
माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे
- January 25, 2023
One thought on “ 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi ”
Very nice essay you written . Thank you sir!
Leave a Reply Cancel reply
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- Privacy Policy
- Terms and Conditions
स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | Independence Day Essay in Marathi
Independence Day Essay in Marathi : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात 200 सालच्या ब्रिटीश सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळाला तो दिवस. हा एक कठोर आणि दीर्घ अहिंसक संघर्ष होता ज्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि महान माणसांनी आमच्या प्रिय मातृभूमीसाठी आपले बलिदान दिले.
स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाच्या वाढदिवसासारखा असतो. आम्ही दरवर्षी 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हे देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरे केले जाते. आपल्या देशाच्या इतिहासात त्याला रेड-लेटर डे म्हटले जाते.
स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Independence Day Essay in Marathi
Table of Contents
स्वातंत्र्य दिनाचा इतिहास
१९४७ मध्ये या दिवशी भारत स्वतंत्र झाला. कठोर आणि अहिंसक संघर्षानंतर आम्हाला ब्रिटीश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविले. आमचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर प्रथमच राष्ट्रध्वज फडकविला. आम्ही आता एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रात हवाचा श्वास घेतो.
या विशेष प्रसंगी, भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महान पुरुष आणि स्त्रियांच्या निःस्वार्थ त्याग आणि अतुलनीय योगदानाची आठवण भारतीय जनतेला आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरदार पटेल आणि गोपाळबंधू दास यांच्यासारख्या नेत्यांना देशातील सर्वांनी आदरांजली वाहिली आहेत.
स्वातंत्र्य दिनी उपक्रम
देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक सभा घेतात, तिरंगा ध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गातात. सर्वांमध्ये मोठा उत्साह असतो. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये हा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो. लाल किल्ल्यासमोरील परेड ग्राऊंडमध्ये सर्व नेते आणि सामान्य लोक मोठ्या संख्येने जमतात. सगळीकडे प्रचंड गडबड आहे. ते किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची रांग लावतात आणि पंतप्रधानांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. पंतप्रधान येऊन ध्वजारोहण करतात आणि ते असे भाषण करतात ज्यामध्ये मागील वर्षातील सरकारच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्या मुद्द्यांकडे अद्याप लक्ष देण्याची गरज आहे त्यांचा उल्लेख केला आहे आणि पुढील विकासाच्या प्रयत्नांना आवाहन केले आहे. यावेळी परदेशी मान्यवरांनाही आमंत्रित केले आहे.
संघर्षाच्या वेळी आपल्या बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली जातात. भारतीय राष्ट्रगीत – जन गण मन गायले जाते. भाषणानंतर भारतीय सैन्य व निमलष्करी दलाच्या परेडचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय ध्वज फडकावत सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये समान धर्तीवर कार्यक्रम आयोजित केले जातात.
सर्व सरकारी आणि खासगी संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या सन्मानाने साजरा केला जातो. विद्यार्थी परेडमध्ये भाग घेतात, राष्ट्रध्वज फडकाण्यापूर्वी राष्ट्रगीत गातात. काही ऐतिहासिक इमारती स्वातंत्र्य थीमचे वर्णन करणारे दिवे विशेष करून सजवलेल्या आहेत. या दिवशी झाडे लावण्यासारखे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येतात. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जातात व विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. सर्वांना मिठाईचे वाटप केले जाते. रस्त्यावरच्या प्रत्येक कोपऱ्यात देशभक्तीपर गाणी ऐकू येऊ शकतात.
या उत्सवाचे आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे पतंग उडविणारा कार्यक्रम जो देशभर मोठ्या उत्साहात भरला जातो. या दिवशी आकाश विविध रंग, पतंगांनी भरलेले आहे.
दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ कार्यक्रमांवरही देशभक्तीचे कार्यक्रम लावले जातात. आमच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध घटना लोकांना आणि मुलांना कळू देण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीवरील प्रेमास प्रेरणा मिळावी यासाठी चॅनेल्स देशभक्तीपर थीमवर आधारित चित्रपट आणि माहितीपट प्रसारित करतात. वर्तमानपत्रे देखील विशेष आवृत्त्या छापतात आणि त्यांच्यावर लिहिलेल्या महान पुस्तकांमधून प्रेरणादायक कथा आणि महापुरुषांच्या जीवनावर छापतात.
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व
स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा दिवस असतो. दरवर्षी हे आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देते ज्यांनी आपल्या मातृभूमीला ब्रिटीशांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि संघर्ष केले. हे आपल्याला त्या महान पराक्रमाची आठवण करून देते, जे स्वतंत्र भारताच्या स्वप्नाचा पाया होते, ज्यांची स्थापना आणि पूर्वजांनी कल्पना केली होती. हे आमच्या पूर्वजांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे आणि आता आपण आपल्या देशाचे भविष्य कसे तयार करू आणि कसे बनवू शकतो हे आपल्या हातात आहे याची आठवण करून देते. त्यांनी भूमिका बजावली आहे. आपण आपला भाग कसा पार पाडतो याकडे देश आता आपल्याकडे पाहत आहे. या दिवशी देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा वारा वाहतो.
अजून वाचा: महात्मा गांधी निबंध मराठी
नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi
माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, leave a reply cancel reply.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
स्वातंत्र्य दिन मराठी निबंध - Independence Day Essay in Marathi - Marathi Essay on Independence Day - Independence Day in Marathi
ADVERTISEMENT
स्वातंत्र्य दिन (Independence Day)
स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट 15, 1947 हा आहे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.पेशवाईच्या अस्ताबरोबर मराठ्यांची मर्दुमकी संपली आणि कधीच ना मावळण्याची इंग्रजांचा सूर्य उगवला. जोपर्यंत या सूर्याची प्रखरता जनमानसाला जाणवत नव्हती, तोपर्यंत इंग्रज लोक आपल्या मर्जीप्रमाणे वागले. इंग्रजरूपी सूर्य जेव्हा डोक्यावर आला, तेव्हा त्याचा प्रखर किरणांनी हिंदुस्थानी जनता हैराण झाली. पारतंत्र्यात गेल्यानंतर त्यातून सुटका होणे कठीण असते. इंग्रजांच्या सैन्याशी लढणे कठीण काम होते. परंतु लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हिंदुस्थानी लोकांनी इंग्रजांविरुद्ध इ.स. १८५७ साली प्रथम बंड केले पण त्यांना यश मिळाले नाही.
सन १७७८ मध्ये देशी छापखान्यांचा कायदा व हत्यारबंदीचा कायदा करण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानी लोकांच्या वर्तमानपत्रावर नियंत्रण आले व दुसऱ्या कायद्याने हिंदी लोकांना निःशस्त्र करण्यात आले. हिंदी लोकांना व इंग्रजांना दिल्या जाणाऱ्या न्यायातही भेदभाव नजरेस येऊ लागला आणि हिंदी लोकांचे पुन्हा डोळे उघडले आणि संघटनेशिवाय सर्व व्यर्थ आहे, हे कळून चुकले. म्हणून हिंदी लोकांच्या सामाजिक, राजकीय, नैतिक व मानसिक उन्नतीसाठी संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला. त्यातून 'इंडियन नॅशनल काँग्रेस 'ची स्थापना केली गेली. काँग्रेस आपल्या अधिवेशनात हत्यारबंदीच्या कायद्यात फेरफार, लष्करी खर्चात कपात, सनदी नोकऱ्यांचे हिंदीकरण, हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांना उत्तेजन, समान वर्तन, अशा तर्हेचे ठराव करून सरकारकडे पाठवत. परंतु या प्रश्नांची उपेक्षा होई. लोक चिडून जात असत. त्या वेळी भारतीय जनतेला टिळकरूपाने पुढारी मिळाला. ते जहाल व राष्ट्रवादी होते. त्यांनी आपल्या 'केसरी ' वर्तमानपत्रातून लोकांमध्ये स्वावलंबन व स्वदेशीचे प्रेम आणि राष्ट्रीय जागृती उत्पन्न करण्याचे महान प्रयत्न केले.
15 ऑगस्ट 1947 या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.१९२० ला टिळकांचे निधन झाले. सारा देश ओक्सबोक्शी रडला. आता लोक निवळतील, अशी इंग्रजांना खात्री वाटू लागली. परंतु घडायचे वेगळेच होते. महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले आणि स्वातंत्र्य-संग्रामात उतरले. सत्याग्रह, असहकार व हातात शस्त्र न घेता प्रतिकार या त्रिसूत्रीची योजना ठरवून, अंमलात आणली. सतत झगडून इंग्रजांना हैराण केले. याच काळात क्रांतिकारक पक्षही काम करीत होते. काँग्रेसचे व क्रांतिकारकांचे ध्येय एकाच होते, परंतु मार्ग भिन्न होते. ८ ऑगस्ट १९४२ साली काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीने 'भारत छोडो'ची घोषणा दिली आणि अहिंसात्मक लढा सुरु केला. सारा देश पेटून उठला. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यावाचून पर्यायच उरला नाही. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पारतंत्र्याची बेडी तुटली.
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.
असा हा स्वतंत्रच लढा १८५७ पासून सुरु झाला होता. त्याला आज यश आले होते. शेकडो वर्षे गुलामगिरीच्या जोखडात अडकून पडलेला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. गांधीजींनी असहकाराच्याद्वारे हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देऊन एक जागतिक विक्रमच केला. या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचा वाटा पण फार मोठा होता. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनीसुद्धा इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. 'पिचेल मनगट परी, उरतील अभंग आवेश ' या आवेशाने लढले, झुंजले. अनेकांना बलिदान करावे लागले. तेही 'आज आमची सरणावरती पेटताच प्रेते, त्या ज्वाळातून उठतील भावी क्रांतीचे नेते' ह्याच विश्वासाने. त्यांनी ज्या स्वप्नासाठी बलिदान केले, त्याग केला, ती स्वप्ने या आपण साकार करूया. दास्यशृंखलांनी बद्ध झालेल्या देशाला त्या वेळी तरुणांनी मुक्त केले. आजही विषमतेची शृंखला दूर करून, आपण आपला देश बलशाली करूया.
IMAGES
VIDEO
COMMENTS
Essay On Independence Day In Marathi स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून १५ ...
Independence Day Essay in Marathi: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्त सम्पूर्ण ...
ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. - Essay on Independence Day in Marathi
अजून वाचा: महात्मा गांधी निबंध मराठी. Independence Day Essay in Marathi : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात 200 सालच्या ब्रिटीश सत्तेपासून भारताला ...
स्वातंत्र्य दिन (Independence Day) स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने ...